शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

हृदयविकाराने मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अपघात विम्याचा लाभ मिळावा, कृषीमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:29 IST

राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्ठमंडळाने अब्दुल सत्तार यांची भेट घेतली.

राज्यातील शेतीसाठी होणारा वीज पुरवठा हा रात्रीच्या वेळी असल्याने शेतकऱ्यांची पुरेशी झोप होत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांना हृदयविकाराच्या समस्या जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास किंवा कुटुंबीयांना शासकीय शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय किसान मजूर महासंघाने महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्ठमंडळाने अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. यावेळी शिष्ठमंडळाने अब्दुल सत्तार यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करून एक निवेदन दिले. यामध्ये राज्यातील शेतीसाठी वीज पुरवठा रात्रीच्यावेळी करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांची झोप पुरेशी होत नाही. तसेच झोप न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरित होत आहे. अशा स्थितीत हृदयविकाराने किंवा आरोग्य सेवा तातडीने न मिळाल्याने उपचारा अभावी शेतकऱ्यांचा होतो. 

हा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकरिता मोठा अपघातच आहे. त्यामुळे अशा इतर कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, सर्व घटनांना अपघाती शेतकरी मृत्यू म्हणून संबोधन करण्यात यावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्ठमंडळात शंकरराव काशीनाथ दरेकर, नितीन अर्जुन थोरात, आबा चंदर जाधव, भाऊसाहेब रामदास माशेरे, अक्षय एकनाथ माशेरे, किरण साहेबराव दरेकर, विनायक गंगाधर जेउघाले आणि युवराज सूर्यवंशी यांचा समावेश होता.

दरम्यान, राज्यात अपघाती मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक आधार मिळावा यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतात काम करताना वीज पडून मृत्यू होणे, सर्पदंश, विजेचा धक्का बसणे, पूर व विंचूदंश यासह इतर अपघातांमुळे मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास आर्थिक सहकार्य देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षभरात हृदयविकारामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटनांचा समावेश शासकीय शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAbdul Sattarअब्दुल सत्तार