शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षाच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी अहमदनगरचा शिवराम बनणार जमीर शेख, काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 14:16 IST

सहा महिन्यापूर्वी जमीर शेख कुटुंबाने मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश घेतला होता. मात्र आता त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे ते पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार करत आहेत. 

अहमदनगर - सहा महिन्यापूर्वी हिंदू धर्माची ओढ लागलेल्या अहमदनगरमधल्या जमीर शेख आणि त्याच्या कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात या कुटुंबाने धर्मांतर केले. मात्र आता त्यांच्या ८ वर्षीय मुलीला गंभीर आजारातून वाचवण्यासाठी कुणीच पुढं येत नसल्याने हे कुटुंब पुन्हा मुस्लीम धर्मात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. 

जमीर शेख याचे हिंदू धर्मात शिवराम आर्य असं नाव करण्यात आलं होतं. या शिवराम यांची ८ वर्षाची मुलगी हिच्या मेंदूत गाठ आहे. त्यामुळे तिच्या ऑपरेशनसाठी ५ लाखाच्या आसपास खर्च येणार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीचा वैद्यकीय खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत शिवराम आर्य सांगतात की, मुलीच्या उपचारासाठी मी बरेच जणांकडे मदतीची विनंती केली, हिंदू झाल्यामुळे अनेकांनी नातेवाईकांनी माझ्याशी नाते तोडले परंतु हिंदू धर्मातील दानशूर माझ्या मुलीच्या उपाचारासाठी धावून येतील अशी अपेक्षा होती. परंतु कुणीही मदत करत नाही. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी जर मी माझा धर्म पुन्हा स्वीकारला तर आमचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुलीच्या डोक्यात गाठ आहे. तिला २ ऑपरेशन करायचे आहेत. हिंदू झाल्यानंतर माझे शिवराम आर्य असं पॅनकार्ड, आधारकार्ड झालं. पत्नीचेही नाव बदललं. परंतु काही कागदपत्रावर मुस्लीम नाव आणि आधार कार्डवर हिंदू नाव यामुळे शासकीय मदत मिळण्यात अडचण होतेय. मुलीच्या आरोग्याचं संकट अचानक आमच्यावर आले. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही. हिंदू सनातन धर्मातील उद्योगपती अन्य मंडळी माझ्या मुलीच्या उपचारासाठी धावतील असं वाटलं होतं. परंतु मी बरेच जणांना फोन केले कुणी मदतीला आलं नाही असं शिवराम आर्य यांनी सांगितले. 

दरम्यान, माध्यमांमुळे जर माझ्या मदतीला कुणी आलं धर्मांतर करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझ्या मुलीच्या उपचारासाठी दानशूरांनी पुढे यावं, मी चुकीचा निर्णय घेतला नाही असं मला वाटेल. जर मदतीला कुणी आलं नाही तर मजबुरीने मला मुस्लीम धर्मात प्रवेश करावा लागेल. त्यानंतर माझ्या नात्यागोत्यातील माझे भाऊ आणि अन्य नातेवाईक मदत करतील अशी अपेक्षा आहे असंही शिवराम आर्य यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदू