शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

...तर नितीशकुमार PM?; प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेगळंच गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:24 IST

देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात.

ठळक मुद्देप्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मुंबई - देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात. त्या वेळी केंद्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल, अशी भूमिका रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मातोश्री भेटीदरम्यान मांडल्याचे समजते.प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीबाबत विविध शक्यता वर्तविण्यात आल्या. भाजपा-शिवसेना युतीसाठी किशोर यांनी ही भेट घेतल्याचे वृत्त देण्यात आले. नव्या माहितीनुसार, काँग्रेस सरकार नको आणि मोदीही नकोत, अशी भूमिका घेत नवी मोट बांधता येईल का, याची चाचपणी मातोश्रीवरील चर्चेदरम्यान करण्यात आल्याचे समजते. प्रशांत किशोर हे रणनीतीकार म्हणून ओळखले जात असले तरी सध्या ते जदयूचे उपाध्यक्षही आहेत. मातोश्री भेटीदरम्यान किशोर यांनी निवडणुकीनंतरच्या शक्यतांची चर्चा केल्याचे समजते. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. त्यात नितीश कुमार पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. ज्यांना काँग्रेसचे सरकार नको आणि मोदींचीही सत्ता नको, अशा पक्षांची जुळवाजुळव शक्य आहे. रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.रालोआमध्ये सहभागी नसलेल्या वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमिती, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक यांसारख्या प्रादेशिक पक्षांचे जवळपास शंभर खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांचे नाव पुढे केल्यास हे पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जदयूच्या उमेदवाराला बिजू जनता दलाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असू शकते, अशी भूमिका किशोर यांनी मांडल्याचे समजते.अंतिम रणनीती शिवसेनेचीच...शिवसेनेने युतीत सहभागी व्हावे, युतीत आल्यास स्वत: किशोर शिवसेनेला विशेष रणनीती आखून देण्यास मदत करतील, असे वृत्त मातोश्री भेटीनंतर देण्यात आले. मात्र, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला नव्हता. विशेष म्हणजे सर्वेक्षण वगैरे ही शिवसेनेची पद्धत नाही. तळागाळापर्यंत पसरलेले संघटनात्मक जाळे ही शिवसेनेची ताकद आहे. राज्यातील लाखो गटप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘ग्राउंड रिपोर्ट’ देत असतात. पक्षप्रमुखांचा थेट गटप्रमुखांपर्यंत असलेला संपर्क हीच शिवसेनेची ताकद आहे.जनहितासाठी विरोधमोदी-शहा जोडगोळीबाबत विविध पक्षांमध्ये अविश्वासाची भावना आहे. मतदारांमध्येही मोदींनी फसवणूक केल्याची भावना वाढीस लागली आहे. ‘उज्ज्वला’ आणि ‘सौभाग्य’सारख्या योजना केवळ कागदावरच आहेत. शिवसेनेने वारंवार ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. जनहिताच्या बाबींसाठी सरकारविरोधात भूमिका घेण्यास शिवसेना कचरली नाही.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी युती झाली. लालकृष्ण आडवाणींसह नितीन गडकरी यांच्यासारख्या मराठी नावाला शिवसेनेचा आक्षेप असण्याचे कारण नाही, अशी भूमिका शिवसेनेतील सूत्रांनी मांडली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrashant Kishoreप्रशांत किशोरShiv Senaशिवसेना