शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

...तर नितीशकुमार PM?; प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेगळंच गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:24 IST

देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात.

ठळक मुद्देप्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मुंबई - देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात. त्या वेळी केंद्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल, अशी भूमिका रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मातोश्री भेटीदरम्यान मांडल्याचे समजते.प्रशांत किशोर यांनी मंगळवारी मातोश्रीवर दाखल होत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीबाबत विविध शक्यता वर्तविण्यात आल्या. भाजपा-शिवसेना युतीसाठी किशोर यांनी ही भेट घेतल्याचे वृत्त देण्यात आले. नव्या माहितीनुसार, काँग्रेस सरकार नको आणि मोदीही नकोत, अशी भूमिका घेत नवी मोट बांधता येईल का, याची चाचपणी मातोश्रीवरील चर्चेदरम्यान करण्यात आल्याचे समजते. प्रशांत किशोर हे रणनीतीकार म्हणून ओळखले जात असले तरी सध्या ते जदयूचे उपाध्यक्षही आहेत. मातोश्री भेटीदरम्यान किशोर यांनी निवडणुकीनंतरच्या शक्यतांची चर्चा केल्याचे समजते. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर अन्य पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. त्यात नितीश कुमार पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. ज्यांना काँग्रेसचे सरकार नको आणि मोदींचीही सत्ता नको, अशा पक्षांची जुळवाजुळव शक्य आहे. रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.रालोआमध्ये सहभागी नसलेल्या वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमिती, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक यांसारख्या प्रादेशिक पक्षांचे जवळपास शंभर खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांचे नाव पुढे केल्यास हे पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जदयूच्या उमेदवाराला बिजू जनता दलाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असू शकते, अशी भूमिका किशोर यांनी मांडल्याचे समजते.अंतिम रणनीती शिवसेनेचीच...शिवसेनेने युतीत सहभागी व्हावे, युतीत आल्यास स्वत: किशोर शिवसेनेला विशेष रणनीती आखून देण्यास मदत करतील, असे वृत्त मातोश्री भेटीनंतर देण्यात आले. मात्र, याला दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला नव्हता. विशेष म्हणजे सर्वेक्षण वगैरे ही शिवसेनेची पद्धत नाही. तळागाळापर्यंत पसरलेले संघटनात्मक जाळे ही शिवसेनेची ताकद आहे. राज्यातील लाखो गटप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘ग्राउंड रिपोर्ट’ देत असतात. पक्षप्रमुखांचा थेट गटप्रमुखांपर्यंत असलेला संपर्क हीच शिवसेनेची ताकद आहे.जनहितासाठी विरोधमोदी-शहा जोडगोळीबाबत विविध पक्षांमध्ये अविश्वासाची भावना आहे. मतदारांमध्येही मोदींनी फसवणूक केल्याची भावना वाढीस लागली आहे. ‘उज्ज्वला’ आणि ‘सौभाग्य’सारख्या योजना केवळ कागदावरच आहेत. शिवसेनेने वारंवार ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. जनहिताच्या बाबींसाठी सरकारविरोधात भूमिका घेण्यास शिवसेना कचरली नाही.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी युती झाली. लालकृष्ण आडवाणींसह नितीन गडकरी यांच्यासारख्या मराठी नावाला शिवसेनेचा आक्षेप असण्याचे कारण नाही, अशी भूमिका शिवसेनेतील सूत्रांनी मांडली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrashant Kishoreप्रशांत किशोरShiv Senaशिवसेना