शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

तेलावर आयात शुल्क, कापूस पिकाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 07:46 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे मंत्रिगटाची बैठक झाली असून, कापूस पिकासंदर्भातही धोरणात्मक निर्णय होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.

ठळक मुद्देराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी बातचीत

राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील तेलवर्गीय पिकांना उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळण्यासाठी आयात होणाºया सर्व प्रकारच्या खाद्य तेलावर ३५ ते ४५ टक्के शुल्क लावण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे मंत्रिगटाची बैठक झाली असून, कापूस पिकासंदर्भातही धोरणात्मक निर्णय होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागांतर्गत सुरू  असलेल्या कापूस, संशोधन व प्रयोगांची माहिती घेण्यासाठी पटेल अकोला येथे आले असताना त्यांनी एकूणच शेतमालाच्या किमती व राज्य कृषी मूल्य आयोगाची भूमिका या विषयावर अनेक मुद्यांचा उलगडा केला. केंद्र शासनाने, सोयाबीन, मूग, उडीद व कापूस या पिकांसाठी किमान आधारभूत दर जाहीर केले; पण शेतकºयांना अद्याप दर मिळालेच नाही. सोयाबीनचे दर प्रचंड घसरले असून, कापूस पिकाबाबतही तेच सुरू  आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाने एक लाख क्ंिवटल सोयाबीन खरेदी करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील तेलवर्गीय पीक उत्पादक शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावेत, त्यादृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू  असून, या विषयावर १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. केंद्रीय मंत्रिगटाच्या बैठकीला कृषी मंत्री राधामोहन सिंग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, संबंधित विभागांचे सचिव आदींची प्रमुख उपस्थिती होती. याच अनुषंगाने राज्य कृषी मूल्य आयोगाने आयात होणाºया पाम, रिफाइन तेलावर ४५ टक्के तर क्रुड पामतेलावर ३५ टक्के तसेच सोयाबीन, सूर्यफूल व माहोरी या तेलाच्या आयातीवरदेखील ३५ टक्के शुल्क लावण्यात यावे, अशी मागणी केंद्र शासनाला केली असून, येत्या आठवड्यात आमच्या या मागण्या मान्य होऊन याबाबत सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य शासनाचे एक लाख क्ंिवटल सोयाबीन खरेदीचे नियोजन आणि तेलावर आयात शुल्क वाढले, तर सोयाबीनच्या दरात निश्चितच वाढ होईल. शेतकºयांनी सोयाबीन विकण्याची घाई करू  नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले. आयात सोयाबीन ढेपला पाच टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यालाही १० टक्के देण्याची शिफारस करण्यात आली असून, आपल्याकडे सोया तेलासह सोयाबीन सीड्स आयात केले जाते. या सोयाबीन सीड्स आयातीवर बंदी घालण्याची मागणी केंद्राला करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.तेलाच्या बाबतीत आपण आजही आयातीवर अवलंबून आहोत. आजमितीस ७६ हजार कोटी रुपयांचे खाद्य तेल आयात केले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या पाच, सहा वर्षांत आयात केलेल्या १०० टक्के  तेलावर विंसबून राहावे लागेल. त्यादृष्टीने महत्त्वाचे निर्णय आताच घेणे क्रमप्राप्त असल्याने त्यांनी सांगितले.

-  कृषी मूल्य आयोगाला कार्यालयच नाही!राज्यात कृषी मूल्य आयोगाची प्रथमच स्थापना झाली; पण अद्याप या पदाला संविधानिक दर्जा प्राप्त झाला नाही, बंगला, कार्यालय नाही, या प्रश्नादाखल त्यांनी कोणतेही नवीन खाते निर्माण केल्यास त्याची पूर्तता करण्यात वेळ लागतोच, असे सांगतानाच कृषी मूल्य आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला असून, अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे. बंगला, कार्यालयाचाही प्रश्न येत्या दोन, चार दिवसांत निकाली निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- सोयाबीन तेल आयातीवर पाच टक्के आयात शुल्क वाढविले  सोयाबीन तेल आयातीवर १२.५ टक्के शुल्क होते. ते ११ आॅगस्ट २०१७ रोजी १७.५ टक्के करण्यात आले. हे शुल्क पाच टक्के वाढविण्यात आले, त्यामुळे सोयाबीन दरात वाढ झाली होती. आता सोयाबीन, सूर्यफूल तसेच मोहरी पिकावर ३५ टक्के आयात शुल्क वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलcottonकापूसTaxकर