शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका; धान्य, कांद्याची आवक घटली, मालवाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 06:50 IST

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली. धान्य वाहतुकीलाही फटका बसला. 

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

मालवाहतूक ठप्पउरण : वाहनचालकांनी जेएनपीए परिसरातील कंटेनर वाहतूक रोखली. नंतर वाहने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता खुला केल्याची माहिती न्हावा - शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिली.  पण, चालकांनीच वाहने चालविण्यास नकार दिला. यामुळे पाचही बंदरातील कंटेनरची वाहतूक ठप्प झाली. आठ हजार कंटेनर ट्रेलर्सवर चालक नसल्याने वाहने उभी करून ठेवल्याची माहिती न्हावा -शेवा कंटेनर ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली. बंदरातून दररोज सुमारे २५ हजार कंटेनरची वाहतूक होते. बंदमुळे त्यांची चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेइकल ॲण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. 

विरोध नेमका कशामुळे ? -जुना कायदा काय म्हणतो?हिट अँड रन घटनांशी संबंधित विद्यमान कायद्याचा भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०४ अ अंतर्गत जो कोणी अविचारी किंवा निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातील.

नवीन कायद्यात काय तरतूद?- १०४ (१) : निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे सदोष मनुष्यवध नाही. दोषीला ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.- १०४ (२) : घटनास्थळावरून पळून गेला किंवा घटनेनंतर लगेच पोलिस अधिकारी किंवा दंडाधिकारी यांना घटनेची माहिती दिली नसेल तर १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.

टॅंकरच्या बंदमुळे इंधन तुटवडा होणार? मनमाड (जि. नाशिक) :  संपात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, इंडेन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले. त्यामुळे राज्यात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. संप कायम राहिल्यास पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदिया : वाहनचालकांनी टायर जाळून संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलनात ट्रक, काळी-पिवळी, ऑटो व टँकरचालक सहभागी झाले.  

टॅग्स :agitationआंदोलनMarketबाजारGovernmentसरकारonionकांदा