शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:56 IST

Maharashtra Politics : आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  शिंदे गटात मंत्रिपदावरुन नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आमदार दीपक केसरकर यांनाही यावेळी मंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे केसरकर नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना एक मोठं विधान केले आहे. यामुळे आता ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. 'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. काल सिंधुदुर्ग येथे माध्यांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

खर्चाला ‘शिस्तीत’ कात्री, वाटेल ती कामे चालणार नाहीत; पहिल्याच बैठकीत अजित पवारांचे संकेत

आमदार दीपक केसरकर म्हणाले, 'अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझ मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्‍यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी आनंदात आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले. 

रामटेक बंगल्यावरुन बोलताना केसरकर म्हणाले,  रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्रि‍पदापर्यंत पोहचले. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. आपणही मुख्यमंत्रि‍पदापेक्षा मोठ्या पदावर जाईन, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. 

नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता केसरकर यांनीही मोठं विधान केले आहे. यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. राणे म्हणाले, कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार, तर दुसरीकडे केसरकर म्हणाले, ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का हे तपासून पाहावं लागेल. यामुळे महायुतीमध्येच रिफायनरीबाबत वेगवेगळी मत असल्याचे दिसत आहे.

मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. सामंत म्हणाले, नाणार प्रकल्पावरुन आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू. नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. २०१९ च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असं सांगितलं होत. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होत. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असंही सामंत म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा