शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

शिंदे गटात अंतर्गत वाद? “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”दीपक केसरकरांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:56 IST

Maharashtra Politics : आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  शिंदे गटात मंत्रिपदावरुन नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आमदार दीपक केसरकर यांनाही यावेळी मंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे केसरकर नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना एक मोठं विधान केले आहे. यामुळे आता ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. 'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. काल सिंधुदुर्ग येथे माध्यांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

खर्चाला ‘शिस्तीत’ कात्री, वाटेल ती कामे चालणार नाहीत; पहिल्याच बैठकीत अजित पवारांचे संकेत

आमदार दीपक केसरकर म्हणाले, 'अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझ मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्‍यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी आनंदात आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले. 

रामटेक बंगल्यावरुन बोलताना केसरकर म्हणाले,  रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्रि‍पदापर्यंत पोहचले. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. आपणही मुख्यमंत्रि‍पदापेक्षा मोठ्या पदावर जाईन, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. 

नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता केसरकर यांनीही मोठं विधान केले आहे. यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. राणे म्हणाले, कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार, तर दुसरीकडे केसरकर म्हणाले, ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का हे तपासून पाहावं लागेल. यामुळे महायुतीमध्येच रिफायनरीबाबत वेगवेगळी मत असल्याचे दिसत आहे.

मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. सामंत म्हणाले, नाणार प्रकल्पावरुन आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू. नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. २०१९ च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असं सांगितलं होत. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होत. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असंही सामंत म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा