शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक तेढ वाढण्यास अशिक्षितपणा कारणीभूत : संजय गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 22:05 IST

धर्म-जाती-रंग-व्यवसायावरुन भेदभाव करणे चूक आहे.

ठळक मुद्देलोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

पुणे : सध्या देशामध्ये धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत असून कलुषित वातावरण निर्माण झाले आहे. त्याला अशिक्षितपणा कारणीभूत असून लोकांचा विवेक हरवत चालला आहे. शैक्षणिक विकासाअभावी योग्य विचारांचाही विकास होत नाही. तुष्टीकरण आणि वोट बँकेच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. राजकारण्यांनी तुष्टीकरणाचे राजकारण करीत प्रत्येक घटनेकडे मजहबी चष्म्यातून पाहिल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे परखड मत ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता यांनी व्यक्त केले. केसरी- मराठा ट्रस्टच्यावतीने गुप्ता यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, महापौर मुरलीधर मोहोळ, दीपक टिळक, रोहित टिळक, प्रणती टिळक उपस्थित होत्या. यावेळी दीपक टिळक यांच्या हस्ते गुप्ता यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना गुप्ता म्हणाले, धर्म-जाती-रंग-व्यवसायावरुन भेदभाव करणे चूक आहे. सर्वांना समान न्याय असायला हवा. त्यामुळे तुष्टीकरण बंद झाल्याशिवाय देशात शांतता प्रस्थापित होणार नाही. माध्यमांनी समाजातील नकारात्मकतेचे वार्तांकन करायलाच हवे. त्याबाबत प्रश्नही उपस्थित केले पाहिजेत. सजग आणि सतर्क समाज निर्मिती हा पत्रकारितेचा धर्म आहे. नैतिक विचार आणि नैतिक आचरणाकरिता माध्यमांना आर्थिक सक्षमता लाभणे आवश्यक आहे. परंतू, त्याकरिता गैर मागार्चा अवलंब करुन आर्थिक बाजू सक्षम करणे गैर आहे. माहिती तंत्रज्ञानाचा दिवसागणिक विकास होत चालला असून माहितेचे जग विस्तारत आहे. डिजीटल माध्यमांनी स्पर्धा वाढविली असून माध्यमांसमोर फेक न्यूजचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोशल मिडीयामुळे माध्यमांच्या विश्वार्हतेला आव्हान दिले असून ते टिकविणे ही वृत्तपत्रांची जबाबदारी आहे. सिटीझन जर्नालिस्टद्वारे समोर येणारी माहिती सुद्धा पडताळून घेण्याची आवश्यकता आहे. ध्येयवादी पत्रकारितेची आवश्यक आहेच. परंतू, नागरिकांनीही प्रस्थापित वृत्तपत्र आणि माध्यमांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे गुप्ता म्हणाले. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी एकत्र येऊन संयुक्त मंच उभा करण्याची गरज आहे. पत्रकारितेला व्यापक स्वरुप देऊन केवळ वाचकांपर्यंत माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता देशातील सहिष्णूता, सलोखा वाढावा याकरिता काम करायला हवे. केवळ बातम्या न देता महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणी, साक्षरता, कुपोषण आदी विषयांवरही माध्यमांंनी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. थोरात म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्व कमी झालेले नाही. वृत्तवाहिन्या पाहिल्या तरी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्यांचे योगदान नाकारता येणार नाही. केसरीवाडा हा प्रेरणास्त्रोत आहे. हे वर्ष लोकमान्यांचे स्मृतीशताब्दी वर्ष असल्याने मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम व्हावा. प्रास्ताविक दीपक टिळक यांनी केले. तर सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. यावेळी विविध संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर निवृत्त कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. =========लोकमान्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे आशीर्वाद आहे. लोकमान्यांच्या लेखणीला असलेली धार आणि स्वातंत्र्यलढ्याची किनार याच्या कसोटीवर उतरण्याचा माझा कायम प्रयत्न राहील असे गुप्ता म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याशी आपल्या परिवाराचा संबंध असल्याचे सांगत त्यांनी पुर्वजांचे नानासाहेब पेशव्यांसोबत असलेले जवळचे संबंध आणि जालियनवालाबाग हत्याकांड व शहीद भगतसिंहांपासून प्रेरणा घेऊन आजोबा स्वातंत्र्यलढ्यात आले त्यालाही गुप्ता यांनी उजाळा दिला. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार