शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

लाखमोलाच्या ‘लाख’ उत्पादकांची उपेक्षा

By admin | Updated: March 22, 2015 01:00 IST

गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी राज्याच्या सीमेवरील गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा भाग लाख उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. येथे काढल्या जाणाऱ्या लाखेला देशातच नाही, तर विदेशातही मोठी मागणी होती.

मनोज ताजने ल्ल गोंदियागेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी राज्याच्या सीमेवरील गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा भाग लाख उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. येथे काढल्या जाणाऱ्या लाखेला देशातच नाही, तर विदेशातही मोठी मागणी होती. पण शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आता लाख उत्पादनाचा जोडधंदा घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. एकेकाळी लाख उत्पादनातून लाखो रुपये कमावून संपन्न जीवन जगणारे येथील शेतकरी आज लाखेला मिळत असलेल्या तोकड्या भावामुळे वैफल्यग्रस्त होत आहेत. केंद्र सरकारने लाख उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक थांबविण्यासाठी या वर्षी हमीभाव जाहीर केला. मात्र राज्य सरकारने त्यातून गोंदिया-भंडारा जिल्ह्याला वगळले. यामुळे प्रत्यक्ष जिथे लाखेचे उत्पादन घेतले जाते तिथल्याच शेतकऱ्यांचे मरण होत आहे. काही वर्षांपूर्वी ५०० रुपये किलोपर्यंत मिळत लाखेला मिळणारे दर आता जेमतेम १५० रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे या व्यवसायावरच गदा येत आहे. साधारणत: ३० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा परिसर धानापेक्षाही लाख उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. लाखेवर प्रक्रिया करणारे जवळपास १०० कारखाने (युनिट) या भागात होते. त्या वेळी अमेरिका जर्मनी, जपान अशा अनेक देशांमध्ये लाखेची मागणी होती. पण दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या जागतिक मंदीत लाखेची मागणी घटली. परिणामी, लाखेचे दरही घटले. आता तर व्यापारी म्हणतील ते भाव द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून लाखेतून मिळणारे उत्पन्नही मिळेनासे झाले आहे. यातूनच या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत.आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना वरदानलाखेचे मुख्य उत्पादन छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांत घेतले जाते. महाराष्ट्रात गोंदिया-भंडारासह गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत काही प्रमाणात घेतले जाते. मुख्यत: पळस आणि बोराच्या झाडावर लाख तयार होते. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वत्र पळसाची झाडे असून, शेतकरी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्यावरील कच्ची लाख काढतात. या लाखेवर प्रक्रिया करून ती विविध प्रकारच्या उपयोगासाठी पाठविली जाते. लाखेचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी शासनाकडून मोफत लाखेची बिजाई देण्यात आली होती. मात्र अलीकडच्या २०-२५ वर्षांत त्यादृष्टीने शासनाकडून काहीही प्रयत्न झालेले नाहीत.राज्य शासन करतेय दुटप्पीपणा? केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने १ जानेवारी २०१५ला लाख खरेदीसाठी हमीभाव जाहीर केले. त्यात रंगिनी व्हेरायटीसाठी २३० रुपये तर कुसुमी व्हेरायटीसाठी ३२० रुपये प्रतिकिलो असा दर देण्यात आला. मात्र महाराष्ट्राच्या आदिवासी विकास महामंडळाने काढलेल्या पत्रात विदर्भातील केवळ चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतीलच शेतकऱ्यांना या हमीभावाचा लाभ मिळेल, असे नमूद केले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यांसोबतच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाख उत्पादकांसोबत असा दुटप्पीपणा का केला, याचे उत्तर आदिवासी विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे नाही.़़़तर येथेही सुरू होतील आत्महत्याराज्यातील अनेक भागांना गेल्या १० ते १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ग्रासले आहे. पण गोंदिया-भंडारा हा भाग त्यापासून अलिप्त आहे. याचे कारण येथील शेतकऱ्यांना धानासोबत जोडधंदा म्हणून लाखेचे उत्पन्न घेता येते. त्यातून त्यांच्या आर्थिक गरजा भागविल्या जातात. पण हमीभावाचे संरक्षण नसल्यामुळे अलीकडे लाख उत्पादकांची ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे त्यातून त्यांची मिळकत कमी होऊन ते कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या दृष्टचक्रात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.झाडावर तयार होणारी ही लाख प्रक्रिया केल्यानंतर अतिशय टणक बनते. काही औषधींसह चॉकलेट बनविण्यासाठी, संरक्षणात्मक वस्तू बनविण्यासाठी आॅर्डनन्स फॅक्टरींमध्ये, हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी, फर्निचरचे पॉलिश तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो. ही लाख पेरू, इंडोनेशिया, अमेरिकेत समुद्रीमार्गे नियमितपणे जाते.