शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

इगतपुरीकडून ‘लॉँग मार्च’ची मंत्रालयाकडे कूच, किसान सभा; विधिमंडळाला घालणार घेराव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:20 IST

‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण हे चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. १२ मार्चला मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.

इगतपुरी (जि. नाशिक) - ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण हे चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. १२ मार्चला मोर्चा मुंबईत पोहचल्यावर विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे.राज्य किसान सभेच्यावतीने कॉ. जिवा पांडू गावित, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतक-यांच्या लॉँग मार्चला प्रारंभ झाला. वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, देवस्थान आणि इनामी जमिनी कसणाºयांनाच द्याव्यात, विनाअट सर्व शेतकºयांना कर्ज मुक्ती द्यावी, वीज बिल माफ करावे, दुष्काळग्रस्त भागात दमण गंगा, नार- पार योजनेचे पाणी द्यावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढण्यात आला आहे.या मोर्चात महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा, येथील शेतकरी सहभागी झाले असून प्रत्येक मुक्कामानंतर या संख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री घाटनदेवी परिसरात मुक्काम केल्यानंतर मार्गक्रमित झालेले मोर्चेकरी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी कळमगाव येथे थांबले आहेत.फडणवीस सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकºयांचे बळी जात आहेत. त्या निषेधार्थ व शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यत मुंबई सोडणार नाही.- कॉ. विलास बाबरपालघर जिल्ह्यातील डहाणू येथील शेतकरी बांधवांची अवस्था दयनीय झाली आहे. कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज महिला दिनी गरीब शेतकºयांना न्यायाकरिता रस्त्यावर उतरावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे.- रु पाली राठोड,जनवादी महिला संघटक, डहाणू 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र