शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल 

By जयंत होवाळ | Updated: April 15, 2024 08:36 IST

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो.

जयंत होवाळ, विशेष प्रतिनिधी

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईतील व्हिक्टोरिया डॉकमध्ये नांगरलेल्या एस. एस. स्टिकीन या जहाजास लागलेल्या भीषण आगीचा सामना करताना अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवान शहीद झाले होते. त्यानंतरही लोकाचे संरक्षण करताना अनेकांनी बलिदान दिले आहे. प्राणांची आहुती दिलेल्या अग्निशमन दलाचे जवान-अधिकाऱ्यांना १४ एप्रिल या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस अग्निशामक दल दिन म्हणूनही पाळला जातो.  

मुंबईची प्रचंड लोकसंख्या, मर्यादित क्षेत्रफळ आणि वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी बांधलेल्या उत्तुंग इमारती, दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते, झोपडपट्ट्या ही सगळी रचना लक्षात घेता अग्निसुरक्षा ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ अग्निशमन दल कार्यक्षम असून, चालणार नाही तर शहरातील नागरिक, विविध संस्था तेवढ्याच सावध असायला हव्या. 

केवळ आगीच्या घटनाच नव्हे तर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती, एखादी दुर्घटना असली तरी अग्निशमन दलाला धावून जावे लागते. अग्निसुरक्षेच्या बाबतीत शहर आणखी सक्षम व्हावे, यासाठी आणखी पाच नवी अग्निशमन केंद्रे मुंबईत उभारली जाणार आहेत. सध्या शहर व उपनगरे मिळून एकूण सहा प्रादेशिक संदेश केंद्रे कार्यन्वित आहेत, तर ३५ अग्निशमन केंद्रे आहेत. मुंबईतील रहदारीचा विचार करता १९ लघु अग्निशमन केंद्रे मोक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणखी एक लघु अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे.

मुंबईत उत्तुंग टॉवर मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. तेथील आग विझवणे हे मोठे आव्हान आहे. वाहतूक कोंडी, दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्ट्या आणि अरुंद रस्ते पाहता आगीची घटना घडल्यास दलाच्या वाहनांना तेथे पोहोचण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी २४ फायर बाईक सेवेत आहेत. २२ विभाग कार्यालयात जलद प्रतिसाद वाहनेही तैनात आहेत.

मुंबईचे अग्निशमन दल केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. याचे कारण मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. त्याचे थोडेसेही नुकसान परवडणारे नाही.

संदेश दळणवळणासाठी अत्याधुनिक यंत्रणेवर आधारित इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल प्रणालीचे मुख्य नियंत्रण कक्ष भायखळा येथे तर उप नियंत्रण कक्ष बोरिवलीत आहे. या सर्व अत्याधुनिक वाहनांचा व साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी मनुष्यबळ आहे. २०२३ मध्ये महिला आणि पुरुष मिळून ४६८ उमेदवारांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. उर्वरित २६८ उमेदवारांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :fireआग