शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल 

By जयंत होवाळ | Updated: April 15, 2024 08:36 IST

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो.

जयंत होवाळ, विशेष प्रतिनिधी

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईतील व्हिक्टोरिया डॉकमध्ये नांगरलेल्या एस. एस. स्टिकीन या जहाजास लागलेल्या भीषण आगीचा सामना करताना अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवान शहीद झाले होते. त्यानंतरही लोकाचे संरक्षण करताना अनेकांनी बलिदान दिले आहे. प्राणांची आहुती दिलेल्या अग्निशमन दलाचे जवान-अधिकाऱ्यांना १४ एप्रिल या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस अग्निशामक दल दिन म्हणूनही पाळला जातो.  

मुंबईची प्रचंड लोकसंख्या, मर्यादित क्षेत्रफळ आणि वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी बांधलेल्या उत्तुंग इमारती, दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते, झोपडपट्ट्या ही सगळी रचना लक्षात घेता अग्निसुरक्षा ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ अग्निशमन दल कार्यक्षम असून, चालणार नाही तर शहरातील नागरिक, विविध संस्था तेवढ्याच सावध असायला हव्या. 

केवळ आगीच्या घटनाच नव्हे तर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती, एखादी दुर्घटना असली तरी अग्निशमन दलाला धावून जावे लागते. अग्निसुरक्षेच्या बाबतीत शहर आणखी सक्षम व्हावे, यासाठी आणखी पाच नवी अग्निशमन केंद्रे मुंबईत उभारली जाणार आहेत. सध्या शहर व उपनगरे मिळून एकूण सहा प्रादेशिक संदेश केंद्रे कार्यन्वित आहेत, तर ३५ अग्निशमन केंद्रे आहेत. मुंबईतील रहदारीचा विचार करता १९ लघु अग्निशमन केंद्रे मोक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणखी एक लघु अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे.

मुंबईत उत्तुंग टॉवर मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. तेथील आग विझवणे हे मोठे आव्हान आहे. वाहतूक कोंडी, दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्ट्या आणि अरुंद रस्ते पाहता आगीची घटना घडल्यास दलाच्या वाहनांना तेथे पोहोचण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी २४ फायर बाईक सेवेत आहेत. २२ विभाग कार्यालयात जलद प्रतिसाद वाहनेही तैनात आहेत.

मुंबईचे अग्निशमन दल केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. याचे कारण मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. त्याचे थोडेसेही नुकसान परवडणारे नाही.

संदेश दळणवळणासाठी अत्याधुनिक यंत्रणेवर आधारित इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल प्रणालीचे मुख्य नियंत्रण कक्ष भायखळा येथे तर उप नियंत्रण कक्ष बोरिवलीत आहे. या सर्व अत्याधुनिक वाहनांचा व साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी मनुष्यबळ आहे. २०२३ मध्ये महिला आणि पुरुष मिळून ४६८ उमेदवारांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. उर्वरित २६८ उमेदवारांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :fireआग