शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:46 IST

देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही असं पवारांनी म्हटलं.

बीड – आमचा सहकारी पक्ष सोडून दिला, कालपर्यंत ठीक होता. कुणीतरी सांगितले पवारसाहेबांचे वय झालंय, भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. तुम्ही माझे वय झालंय बोलता पण तुम्ही माझं काय बघितलंय? तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होते हे पाहिलेय, तरुण पिढीच्या मदतीने अनेकांचे पराभव झालांय, सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा. नाही केले तर लोकं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले की, जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला जुन्या काळाची आठवण झाली. लोकांच्यामध्ये राहणारे नेतृत्व, जी निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नसते, बीडची जनता त्यांच्यापाठीमागे शक्ती उभी करते. संदीपने ते दाखवले. अनेक वर्षापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. त्यावेळी असा एक प्रसंग आला. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांकडे होतो. आम्ही सगळे त्यांच्या विचारधारेने काम करत होतो. तेव्हा खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका काहींनी मांडली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यात नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली, नेत्यांच्या निष्ठेशी मी तडजोड करणार नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी माघार घेणार नाही. तशी भूमिका त्याकाळात केली. आज तीच स्थिती त्यांच्या नातूने केली याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. राजधर्म, भाषा यामधून समाजात अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. बियाणे-खतांच्या किंमती वाढल्यात. न परवडणारी शेती अशी अवस्था झाली. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी अडचणीत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस