शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:46 IST

देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही असं पवारांनी म्हटलं.

बीड – आमचा सहकारी पक्ष सोडून दिला, कालपर्यंत ठीक होता. कुणीतरी सांगितले पवारसाहेबांचे वय झालंय, भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. तुम्ही माझे वय झालंय बोलता पण तुम्ही माझं काय बघितलंय? तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होते हे पाहिलेय, तरुण पिढीच्या मदतीने अनेकांचे पराभव झालांय, सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा. नाही केले तर लोकं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले की, जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला जुन्या काळाची आठवण झाली. लोकांच्यामध्ये राहणारे नेतृत्व, जी निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नसते, बीडची जनता त्यांच्यापाठीमागे शक्ती उभी करते. संदीपने ते दाखवले. अनेक वर्षापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. त्यावेळी असा एक प्रसंग आला. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांकडे होतो. आम्ही सगळे त्यांच्या विचारधारेने काम करत होतो. तेव्हा खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका काहींनी मांडली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यात नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली, नेत्यांच्या निष्ठेशी मी तडजोड करणार नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी माघार घेणार नाही. तशी भूमिका त्याकाळात केली. आज तीच स्थिती त्यांच्या नातूने केली याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. राजधर्म, भाषा यामधून समाजात अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. बियाणे-खतांच्या किंमती वाढल्यात. न परवडणारी शेती अशी अवस्था झाली. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी अडचणीत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस