शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:46 IST

देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही असं पवारांनी म्हटलं.

बीड – आमचा सहकारी पक्ष सोडून दिला, कालपर्यंत ठीक होता. कुणीतरी सांगितले पवारसाहेबांचे वय झालंय, भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. तुम्ही माझे वय झालंय बोलता पण तुम्ही माझं काय बघितलंय? तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होते हे पाहिलेय, तरुण पिढीच्या मदतीने अनेकांचे पराभव झालांय, सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा. नाही केले तर लोकं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले की, जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला जुन्या काळाची आठवण झाली. लोकांच्यामध्ये राहणारे नेतृत्व, जी निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नसते, बीडची जनता त्यांच्यापाठीमागे शक्ती उभी करते. संदीपने ते दाखवले. अनेक वर्षापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. त्यावेळी असा एक प्रसंग आला. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांकडे होतो. आम्ही सगळे त्यांच्या विचारधारेने काम करत होतो. तेव्हा खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका काहींनी मांडली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यात नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली, नेत्यांच्या निष्ठेशी मी तडजोड करणार नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी माघार घेणार नाही. तशी भूमिका त्याकाळात केली. आज तीच स्थिती त्यांच्या नातूने केली याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. राजधर्म, भाषा यामधून समाजात अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. बियाणे-खतांच्या किंमती वाढल्यात. न परवडणारी शेती अशी अवस्था झाली. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी अडचणीत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही असा आरोप शरद पवारांनी केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस