निवडणुक लढवायची असेल तर विकासाचे ‘व्हिजन’ सांगा !

By Admin | Updated: January 8, 2017 02:52 IST2017-01-08T02:52:33+5:302017-01-08T02:52:33+5:30

राज्य निवडणूक आयोग विचारणार प्रतिज्ञापत्रामध्ये सात प्रश्न : मनपा निवडणुकीचा कार्यक्रम आठवडाभरात!

If you want to fight for the election, tell 'Vision' of development! | निवडणुक लढवायची असेल तर विकासाचे ‘व्हिजन’ सांगा !

निवडणुक लढवायची असेल तर विकासाचे ‘व्हिजन’ सांगा !

अकोला, दि. ७- महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उच्छुक उमेदवारांना आता प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या भागातील विकासाचे ह्यव्हिजनह्ण विचारले जाणार आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्रात उमेदवारांना विकासासंबंधी उमेदवारांची संकल्पना काय आहे, यासंदर्भात सात प्रश्न विचारण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करतांनाच राज्यातील जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम येत्या आठवडाभरात (१५ जानेवारीपूर्वी) जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शनिवारी येथे दिले.
अकोला महानगरपालिका आणि बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक पूर्वतयारीची आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून, आचासंहिता लागू होणार असल्याचे सांगत महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये संगणकाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येणार असून, निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि त्यासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच या प्रक्रियेत उमेदवारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्ज भरता येतात. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात येत असल्याने, उमेदवारांच्या माहितीचा ह्यडाटाह्ण राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध होत आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ४0 हजार उमेदवारांचा ह्यडाटाह्ण निवडणूक आयोगाकडे उपलब्ध झाला, असे ज.स. सहारिया यांनी सांगितले. उमेदवारांची माहिती मतदारांना मिळावी तसेच निवडणुका मुक्त आणि पारदश्री वातावरणात पार पाडण्यासाठी या उपाययोजना राबविण्याचा मानस आहे. प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्च सादर न केल्यास निवडून आलेले संबंधित सदस्य आणि नगरसेवक अपात्र होऊ शकतात. निवडणूक निकालानंतर उमेदवाराने २0 दिवसांत आणि राजकीय पक्षांनी ६0 दिवसांत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक असल्याचेही ज.स. सहारिया यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.

प्रतिज्ञापत्रातील उमेदवारांचा गोषवारा करणार जाहीर!
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचा गोषवारा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांचे नाव, शिक्षण, स्थावर आणि जंगम मालमत्ता, गुन्हय़ाची शिक्षा आणि प्रलंबित प्रकरण इत्यादी प्रकारच्या माहितीचा गोषवारा मनपा व जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले.

Web Title: If you want to fight for the election, tell 'Vision' of development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.