शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 11:37 IST

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली.

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी जो काही मराठी अस्मिता जपणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नाने आयोजित केला होता तिथे आले होते. यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मराठीसम्राट मा. राज ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून फालतू टीका केली.राज ठाकरे व एक यूपीचा रिक्षावाला यांचा डीएनए तपासला तर दोघांचा डीएनए नक्कीच एक निघेल, असे वक्तव्य त्यांनी या जाहीर कार्यक्रमात केले. याशिवाय यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज यांनी आपल्याला डीएनएबाबत आव्हान केल्यास राज यांचा डीएनए यूपीचाच असल्याचे सिद्ध करून दाखवू, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच राज यांना हे माहीत असल्यानेच ते सध्या यूपीवाल्यांच्या विरोधात बोलत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.दरम्यान स्वामी यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम ह्यांच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते एकटे कार्यक्रम ठिकाणी पोहोचले व थेट स्वामींना राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. त्यावेळी कदम यांनी स्वामीना उद्देशून तुम्ही मराठी माणसासाठी काय केले आहे .राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच सत्ताधारी तुम्ही, एकहाती सत्ता आहे. मग शहर सुंदर करा फेरीवालामुक्त करा, असली स्टेटमेंट करून आपापसात भांडण का लावता, असा जाब विचारला. त्यावेळेस स्वामी बोलले तुम लोग युपीके टॅक्सीवालेको मारते हो, तेव्हा राजेश कदम ह्यांनी मुंबई व परिसराची कॅप्यासिटी संपली आहे, लोंढे थांबवा ह्या मा. राजसाहेबांच्या इशाऱ्याला आता एका अहवालाने सुद्धा पुष्टी दिली त्यावर अभ्यास करा, तसेच त्यांना तुमच्या प्रांतात येऊन मराठी माणसाने कायदे कानून तोडले तर तुम्ही सहन कराल का..? मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी भूमीवर जो प्रेम करतो तो मराठी मग तो यूपीवाला असो की बिहारवाला ही व्याख्या समजावून सांगितली. जवळपास तीन ते चार मिनिटे राजेश कदम स्वामींना त्यांच्याच बॉडीगार्डच्या घोळक्यात घुसून समजावत होते. मनसे देशाला मानतो पण महाराष्ट्राची वेळ येईल तिथे प्राधान्य आमच्या महाराष्ट्राला, काश्मीरमध्ये पण आम्ही घुसायला तयार आहोत. पण उगीच तुम्ही अश्या फालतू स्टेटमेंट करून राज्याराज्यात भांडणे लावू नका, असे सुनावल्यावर स्वामींची बोलतीच ह्यावेळी बंद झाली होती. ह्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील तेथे स्वामींसोबत चहापाणी करत होते, मात्र राजेश कदम यांच रौद्ररूप पाहून व कदाचित मराठी माणूस म्हणून व राजसाहेबांबाबतचे जे खडे बोल स्वामींना एेकवले ते त्यांना पटत असल्यामुळे राज्यमंत्र्यांनी देखील राजेश कदम यांची समजूत काढून संयमाने विषय हाताळला..मराठी डोंबिवलीत येऊन मराठी हृदयसम्राटांविषयीचे वेडेवाकडे बोल सहन केले जाणारच नाही, मागे देखील रोटरीच्या अश्याच कार्यक्रमाला डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात लालूप्रसाद यादवला आमंत्रित केले होते, मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते, लालूला मनसे कार्यकर्त्यांपासून तोंड लपवत छपवत डोंबिवलीच्या बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली होती.डोंबिवलीतल्या सामाजिक संस्थांना विनंती, महाराष्ट्रात व मराठी असलेले व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रमुख वक्त्यांची येथे कमी नाही, स्वामी, लालू सारख्या बेडगी व मराठी माणसांचा द्वेष करणारे, अपमान करणारे पाहुणे हवेतच कश्याला..? येवढा तरी मराठीचा अभिमान बाळगा ही विनंती. मा.राज ठाकरे जे करतात ते मराठी अस्मितेसाठीच करत आहेत भले आम्हाला तुमचे मतदान नका करू पण मराठी माणसाचा अपमान सुध्दा सहन नका करू ही विनंती.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसेMNSमनसेSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी