शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:57 IST

आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

पुणे - एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्याचे नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांचे ऐकावं असं ते नेते नाहीत. ते घटनाबाह्य पद्धतीने पदावर बसलेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर बेकायदेशीर बसले आहेत. शिंदे स्वत:ला नेते साध्य करण्यासाठी कधी काय निर्णय करतील हे मला सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या मराठा आंदोलनाला मॅनेज करण्याची क्षमता नाही. हा अंतर्गत राजकारणाचा घोटाळा आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

पुण्यात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली त्यात संजय राऊत म्हणाले की, जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते. सरकार ती भूमिका मांडताना त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो सरकारविरोधात बंड करतोय. अशावेळी मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करू शकतात. पण ज्याअर्थी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतायेत, मुख्यमंत्री वेगळे बोलतायेत. छगन भुजबळ वेगळे मांडतायेत. याचा अर्थ सरकारच्या मंत्रिमंडळात बेबनाव आहे. म्हणून मुख्यमंत्री खरोखरच सक्षम असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना मी बडतर्फ करतोय अशी शिफारस राज्यपालांना केली पाहिजे. हिंमत असेल तर ते नेते असं खुलं चॅलेंज राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे. 

तसेच तू ओबीसींची भूमिका घे, मी मराठ्यांची भूमिका मांडतो. दोघांना मुर्ख बनवतो असं सत्ताधाऱ्यांचे असू शकते. कुरघोडी करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणतोय. परंतु या सरकारमध्ये हिंमत नाही. जनतेच्या मनात काय हे समजायचे असेल तर निवडणूक घ्या. १४ महापालिका निवडणूक रखडल्या आहेत. न्यायव्यवस्था तुमची गुलाम आहे. तुम्ही आता निवडणूक घ्या. आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, ज्यादिवशी देशातील जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल तेव्हा भाजपा हरेल. भाजपा जिंकत नाही तर मशिन जिंकते. अलीकडच्या काळात मध्य प्रदेशात जे निकाल लागले ते लागूच शकत नव्हते. काहीतरी गडबड आहे. EVM नसेल तर भाजपा ग्रामपंचायतही जिंकणार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे हा किडा काढणारे भाजपाचेच होते. काँग्रेस सरकार असताना सगळ्यात आधी किरिट सोमय्या पुढे आले. देशभरात EVM घोटाळ्याबाबत जागरुक करण्याचे काम भाजपाने आधी केले. घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तीच्या गुलाम बनून काम करणार असतील तर न्याय कशा मिळणार? देशातील लोकशाहीचे मालक गुजरातमधील दोन व्यापारी झालेत असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSushma Andhareसुषमा अंधारे