शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

झेपत नसेल तर विमानाप्रमाणे रेल्वेचेही खासगीकरण करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 06:11 IST

दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही.

मुंबई - दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते. लोकांचे हाल होतात. मात्र, रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. रेल्वेला हे झेपत नसेल, तर त्यांनी विमानतळाप्रमाणे रेल्वेचे खासगीकरण करावे, अशी शब्दांत उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला मंगळवारी चपराक लगावली.दिव्यांगांसाठी रेल्वेसेवेत विशेष सोईसुविधा पुरविण्यासंदर्भात ‘इंडिया सेंटर फॉर ह्युमन राइट्स अँड लॉ’ या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर, न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.मुंबईत सतत तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम रेल्वेवरही झाला. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी लोकल ठप्प झाली. काही काळाने लोकल सुरू झाली. मात्र, गाड्या उशिराने धावत होत्या. याची नोंद घेत उच्च न्यायालयाने रेल्वेला फैलावर घेतले. ‘दरवर्षी पावसाळ्यात सखोल भागातील रूळ पाण्याखाली जातात. सायन, माटुंगा, मानखुर्द, नालासोपारा यांसारख्या सखोल भागातील रूळ मान्सूनपूर्वच वाढविण्याचे काम का करण्यात येत नाही?’ असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वेला केला.रेल्वे रुळांची देखभाल, प्लॅटफॉर्मची देखभाल, स्वच्छता यांसारख्या बाबी रेल्वेला करणे शक्य नसेल, तर त्यांनी याचे खासगीकरण करण्याचा गांभीर्याने विचार करावा. आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकही आंतरराष्ट्रीय दर्जाची करता येतील. प्रवासी तुमच्याकडून याच सुविधांची अपेक्षा करतात, असे न्यायालयाने म्हटले.‘स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन बोर्ड स्थापन करा’छोट्या छोट्या परवानग्यांसाठी दिल्लीला जावे लागणार नाही, यासाठी मुंबईतच स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन बोर्ड स्थापन करून त्यांनाच अधिकार का देत नाही? असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणीत याबाबत सूचना घेण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.

टॅग्स :railwayरेल्वेMumbai High Courtमुंबई हायकोर्ट