शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जमत नसेल तर राजकारण सोडून द्या, पंकजांचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:28 IST

पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली.

मुंबई: एखाद्याला राज्य पातळीवरचे मोठे राजकारण करायला जमत नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धनंजय व पंकजा मुंडे या भावंडांतील अंतर्गत स्पर्धेमुळे लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक रंगतदार झाली होती. पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला.  याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विरोधकांनी राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा दाखवून दिली. राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी रमेश कराड यांना पक्षात घेतले. मात्र, त्यानंतर कराड यांच्यावर इतका दबाव आला की, त्यांनी माझ्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्वत:चा अधिकृत उमेदवार राहिला नाही. अखेर त्यांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. हे सर्व करताना त्यांनी मित्रपक्षांना कुठेही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांचं गणित चुकत होतं. राज्यपातळीवर राजकारण करण्यासाठी जी समज लागते ते करण्यात विरोधक कमी पडले. त्यामुळे विरोधक केवळ जिंकण्याच्या वल्गना करत राहिले. परंतु राजकारणात अंतिम निर्णय आल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नसते. त्यामुळे मी स्वत:चे काम करत राहिले आणि केवळ वल्गना करणाऱ्यांना आज तोंडघशी पडावे लागले, असे पंकजा यांनी सांगितले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेElectionनिवडणूक