शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जमत नसेल तर राजकारण सोडून द्या, पंकजांचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:28 IST

पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली.

मुंबई: एखाद्याला राज्य पातळीवरचे मोठे राजकारण करायला जमत नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धनंजय व पंकजा मुंडे या भावंडांतील अंतर्गत स्पर्धेमुळे लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक रंगतदार झाली होती. पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला.  याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विरोधकांनी राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा दाखवून दिली. राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी रमेश कराड यांना पक्षात घेतले. मात्र, त्यानंतर कराड यांच्यावर इतका दबाव आला की, त्यांनी माझ्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्वत:चा अधिकृत उमेदवार राहिला नाही. अखेर त्यांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. हे सर्व करताना त्यांनी मित्रपक्षांना कुठेही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांचं गणित चुकत होतं. राज्यपातळीवर राजकारण करण्यासाठी जी समज लागते ते करण्यात विरोधक कमी पडले. त्यामुळे विरोधक केवळ जिंकण्याच्या वल्गना करत राहिले. परंतु राजकारणात अंतिम निर्णय आल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नसते. त्यामुळे मी स्वत:चे काम करत राहिले आणि केवळ वल्गना करणाऱ्यांना आज तोंडघशी पडावे लागले, असे पंकजा यांनी सांगितले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेElectionनिवडणूक