शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:31 IST

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नसल्याने जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

जालना - सरकारला मराठ्यांची गरज नाही, त्यामुळे ते संपर्क ठेवत नाही. जातीजातीत भांडणं लावण्यासाठी भुजबळांच्या संपर्कात सरकार आहे. सरकारला मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नाही. मराठ्यांचे प्रश्न सोडवायला मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे वेळ नाही. आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला सत्तेत जावं लागणार असं सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत फडणवीसांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास नकार आहे समजा, पण तुमची भूमिका काय?, मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही हे सांगा. एकमेकांवर ढकलता कशाला, तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला होकार द्या, मराठे तुमच्या पाठिशी उभे राहतील. महायुती-मविआ कुणीतरी हा म्हणा, मराठ्यांना वेड्यात काढू नका असं त्यांनी सांगितले. 

तेसच प्रसाद लाड मला मॅनेज करायला आलेत का? या लोकांनी दुकान सुरू केलेत. फोडाफोडीचं राजकारण करतायेत. आमदारकी देतो, मी बाजूला जातो ही गचाळ माणसं आहेत. मी राजकारणावर काही बोललो नाही. १० महिने माझा समाज आरक्षण मागतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही. १९ ऑगस्टला ११ महिने होतील. तुम्ही आरक्षण देत नसाल तर आम्हालाच सरकार बनवावं लागेल. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला पाडावं लागेल. सर्व गोरगरिब समाजातील लोकांना सत्तेत बसवावं लागेल. आम्ही प्रामाणिकपणे आरक्षण मागतोय, तुम्ही देणार नसाल तर मराठ्यांवर अन्याय करत असाल तर आम्हाला सत्तेत जावं लागणार, राजकारण करावं लागणार. हे माझ्या समाजाचं म्हणणं आहे ते मी करतोय असंही जरांगेंनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सत्ता स्थापन करेपर्यंत या लोकांना गरिबांची गरज लागते. सत्ता सोडू शकत नाही. मोदी शिर्डीला आले तेव्हाच आरक्षणावर लक्ष घाला बोललो होतो. आतमधून कपटाने भरलेली लोक आहेत. देशातील मोठ्या जाती भाजपाला संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, यादव या सर्व जाती संपवायच्या आहेत. पण मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल हे त्यांना माहिती नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाला दिला. 

..तर येवल्यात आंदोलन करू

ओबीसी आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. त्यामुळे तुम्ही विनाकारण आमच्यात पडण्याची गरज नाही. उगाच आपल्यातले संबंध बिघडवू नका. आम्ही त्यांना बोलत नाही याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करतो याचा अर्थ वेगळा काढू नका. छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. आमच्याकडे उपोषणाला बसवतो, रॅली काढायला लावतो. मग मी येवल्यात सुरू केले तर, मग कसं होईल. आम्हालाही महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा अधिकार आहे ना, आमच्याकडे काड्या लावायला लागला तर आम्ही येवल्यात, नाशिकमध्ये येऊन आंदोलन करण्याचा विचार आहे असं जरांगेंनी सांगितले आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा