शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:15 IST

मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला. 

सुरुवातीच्या काळात सुप्रिम कोर्टात जे विधेयक मांडले गेले ते जाणीवपूर्वक मराठा आरक्षण संदर्भात विधेयक कमजोर व्हावे असा प्रयत्न केला गेला. आता तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे आरक्षण जे आहे ते तुम्ही मिळवून दाखवा, उगाच इतरांना कशासाठी दोष देत आहात असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्राने यात हस्तक्षेप करून घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाला न्याय देण्यासंदर्भात गेल्या  काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितलं होते की जर मी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन. अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी मागणी खडसेंनी केली आहे. 

मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला. 

सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जात असेल. मात्र ज्या ज्या वेळी संकटमोचक गिरीश महाजन हे भेटीला गेले आहेत ते फेल ठरले आहेत. विनाकारण शिष्ट मंडळ बनून जायचे आणि नाटक करायचे. फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिष्ट मंडळ जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेले तरी तो प्रश्न सुटणार नाही. प्रामाणिक इच्छा असेल तर विधानसभेत प्रस्ताव मंजूर करावा. तो दिल्ली येथे घेऊन जाऊन घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावे. अधिवेशन हे घेतलेच पाहिजे आणि त्यात हा प्रश्न सोडवला पाहिजे, असेही खडसेंनी म्हटले आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस