शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

"स्वाभिमानी असतील तर...": केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:28 IST

हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २५ हून अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे असं त्यांनी सांगितले. 

गटनेते पदावरून का काढलं?; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद

तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा, भाजपासोबत सरकार बनवा असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची भूमिका हिंदुत्ववादाची आहे. अडीच वर्षापूर्वी सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड केली. मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही या पदावर राहता कामा नये. परंतु ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्वरीत राजीनामा राज्यपालांकडे पोहचवायला हवा. ५५ मधले ३५ आमदार नाहीत मग वाट कशाला पाहताय? स्वाभिमानी असतील तर मुख्यमंत्री वर्षा खाली करतील असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. अडीच वर्षात कुठलाही विकास केला नाही. केवळ सुडाच्या भावनेतून कारवाया, अपशब्द बोलायचा. मुख्यमंत्रिपदाची मान, शान, सन्मान घालवला. त्यामुळे जे होते चांगल्यासाठी होते. आता काही तासांत या महाराष्ट्रात काय घडतं हे पाहावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीबाहेर कुणालाही अधिकार नाही. नगरविकास खात्यात कुटुंबातील व्यक्तींना पूर्ण अधिकार होते. शिवसेनेच्या वाट्याचे जे सरकार होते ते केवळ मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी होते असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे