शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

"स्वाभिमानी असतील तर...": केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:28 IST

हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २५ हून अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे असं त्यांनी सांगितले. 

गटनेते पदावरून का काढलं?; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद

तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा, भाजपासोबत सरकार बनवा असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची भूमिका हिंदुत्ववादाची आहे. अडीच वर्षापूर्वी सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड केली. मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही या पदावर राहता कामा नये. परंतु ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्वरीत राजीनामा राज्यपालांकडे पोहचवायला हवा. ५५ मधले ३५ आमदार नाहीत मग वाट कशाला पाहताय? स्वाभिमानी असतील तर मुख्यमंत्री वर्षा खाली करतील असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. अडीच वर्षात कुठलाही विकास केला नाही. केवळ सुडाच्या भावनेतून कारवाया, अपशब्द बोलायचा. मुख्यमंत्रिपदाची मान, शान, सन्मान घालवला. त्यामुळे जे होते चांगल्यासाठी होते. आता काही तासांत या महाराष्ट्रात काय घडतं हे पाहावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीबाहेर कुणालाही अधिकार नाही. नगरविकास खात्यात कुटुंबातील व्यक्तींना पूर्ण अधिकार होते. शिवसेनेच्या वाट्याचे जे सरकार होते ते केवळ मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी होते असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे