शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

"स्वाभिमानी असतील तर...": केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:28 IST

हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २५ हून अधिक आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे असं त्यांनी सांगितले. 

गटनेते पदावरून का काढलं?; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद

तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा, भाजपासोबत सरकार बनवा असं शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची भूमिका हिंदुत्ववादाची आहे. अडीच वर्षापूर्वी सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड केली. मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही या पदावर राहता कामा नये. परंतु ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्वरीत राजीनामा राज्यपालांकडे पोहचवायला हवा. ५५ मधले ३५ आमदार नाहीत मग वाट कशाला पाहताय? स्वाभिमानी असतील तर मुख्यमंत्री वर्षा खाली करतील असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

दरम्यान, हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. अडीच वर्षात कुठलाही विकास केला नाही. केवळ सुडाच्या भावनेतून कारवाया, अपशब्द बोलायचा. मुख्यमंत्रिपदाची मान, शान, सन्मान घालवला. त्यामुळे जे होते चांगल्यासाठी होते. आता काही तासांत या महाराष्ट्रात काय घडतं हे पाहावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीबाहेर कुणालाही अधिकार नाही. नगरविकास खात्यात कुटुंबातील व्यक्तींना पूर्ण अधिकार होते. शिवसेनेच्या वाट्याचे जे सरकार होते ते केवळ मातोश्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी होते असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे