शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:04 IST

"काल मला मिळालेल्या नोटीसमध्ये संभाजीराजांविषयी मी कपोलकल्पित किंवा बदनामीकारक लिहिल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांनी पान क्रमांक टाकून नेमके प्रसंग व घटना माझ्या निदर्शनास आणायला हव्या होत्या. त्यांच्याकडून त्यांचे आक्षेप आम्ही मागून घेत आहोत. एकदा त्यांचे नेमके आक्षेप मला समजल्यावर मी नक्कीच त्यांच्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार  करेन."

सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक विश्वास पाटिल यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. पाटील यांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा दावा करत, त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा पुण्यात एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे. यानंतर, आता एका फेसबुक पोस्टच्या माध्यमाने विश्वास पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या या पत्रकार परिषदेसंदर्भात आणि आक्षेपांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. "लेखनामध्ये काही चुकले असल्यास ते दुरुस्त करण्यामध्ये व त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात, असे पाटील यांनी म्हटले आहे.काय म्हणाले विश्वास पाटील?संभाजी ब्रिगेडच्या या पत्रकारपरिषदेसंदर्भात आणि त्यांच्या आक्षेपांसंदर्भात विश्वास पाटील यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आज पुणे येथे संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वकिलांकडून काल आमच्याकडे लीगल नोटीस प्राप्त झाली आहे. या निमित्ताने मी फक्त एवढेच सांगेन की माझी “संभाजी” ही कादंबरी वीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असून ती महाराष्ट्रातील जनतेने घराघरात मोठ्या गांभीर्याने वाचली आहे. तिचे ऐतिहासिक व वाङ्मयीन मूल्य लक्षात घेऊन भारतीय ज्ञानपीठासारख्या संस्थेने ती अठरा वर्षांपूर्वी हिंदीमध्ये व अन्य भाषांमध्येही प्रकाशित केली आहे."

...तर गांभीर्याने विचार  करेन" -"काल मला मिळालेल्या नोटीसमध्ये संभाजीराजांविषयी मी कपोलकल्पित किंवा बदनामीकारक लिहिल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांनी पान क्रमांक टाकून नेमके प्रसंग व घटना माझ्या निदर्शनास आणायला हव्या होत्या. त्यांच्याकडून त्यांचे आक्षेप आम्ही मागून घेत आहोत. एकदा त्यांचे नेमके आक्षेप मला समजल्यावर मी नक्कीच त्यांच्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार  करेन," असे पाटील यांनी म्हलटे आहे.

आयुष्याची साडेपाच वर्ष संशोधन व अभ्यास केला -विश्वास पाटील पुढे म्हणाले, "संभाजीराजांचा शोध घेण्यासाठी मी माझ्या आयुष्याची साडेपाच वर्ष संशोधन व अभ्यास केला आहे. शंभूराजांचे सुमारे अडीचशेहून अधिक किल्ले महाराष्ट्र कर्नाटक, गोवा व आजच्या तामिळनाडूच्या त्रिचनापल्लीच्या किल्ल्यापर्यंत जाऊन पाहिले आहेत. शक्य तिथे सर्वदूर प्रवास केला आहे. तरीही काही अनवधानाने राहून गेले असल्यास त्यांनी ते मला नेमके दाखवून द्यावे. माझ्याकडे असणारी ग्रंथसामग्री व संशोधनाच्या सर्व मार्गांनी मी त्याची सत्यता पडताळून पाहीन." ... परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात -"संभाजी राजे हे आमच्यासाठी अभिमानाचा आणि श्वासाचा एक भाग आहे. गेली वीस वर्षे या विषयावर मी अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिलेली आहेत. लेखनामध्ये काही चुकले असल्यास ते दुरुस्त करण्यामध्ये व त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात.  त्यांच्या वकिलानासुद्धा आमच्या वकीलाकडून तशी मागणी करत आहोत," असेही विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. सध्या ते एका साहित्य महोत्सवानिमित्त बिहारमधील पाटणा येथे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vishwas Patil responds to allegations regarding his novel 'Sambhaji'.

Web Summary : Writer Vishwas Patil addresses Sambhaji Brigade's objections to his novel 'Sambhaji,' welcoming specific corrections and expressing willingness to apologize for errors after review. He emphasizes his extensive research and commitment to historical accuracy.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड