शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

२०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 08:11 IST

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि.जालना) :  मुंबई येथे आमरण उपोषण करणार असून, २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरुवात होईल. २० जानेवारीलाच अंतरवाली सराटी येथून सर्व जण निघणार असून, पाच ते सहा दिवसांत मुंबईला पोहोचू. यासाठी दहा  ते पंधरा दिवसांत नियोजन केले जाईल. मुंबईत जवळपास तीन कोटी समाजबांधव व दहा लाख गाड्या जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.   

ते म्हणाले की, २० जानेवारीपर्यंत मार्ग निघत असल्यास चर्चेला हरकत नाही. क्युरिटिव्ह पिटीशन न्यायालयाने दाखल करून घेतल्याने तोही मराठा समाजबांधवांचा विजय आहे. क्युरिटिव्ह पिटीशनला आम्ही नाकारलेलेच नाही.    

उपोषणाचा निर्णय घेऊ नये : देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गांभीर्याने काम करीत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचेही काम वेगाने सुरू आहे. शिंदे समितीचा तिसरा अहवालही लवकरच प्राप्त होईल. ओबीसी समाजाला त्रास, अन्याय होणार नाही याची काळजी घेऊनच सरकार  कार्यवाही करीत आहे. ही सकारात्मक बघता मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईत रविवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवालही अपेक्षित आहे. त्यात निजामकालीन नोंदी हैदराबादहून प्राप्त करून घेत आहोत.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण