तारापूरला पुराचा वेढा तर बोईसरला चाळींमध्ये पाणी
By Admin | Updated: September 22, 2016 03:22 IST2016-09-22T03:22:26+5:302016-09-22T03:22:26+5:30
मुसळधार पावसाने घरे, रस्ते व पूलांचा ताबा घेतल्याने तारापूर-बोईसर, बोईसर-आतेवाडी इ. मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली

तारापूरला पुराचा वेढा तर बोईसरला चाळींमध्ये पाणी
बोईसर : मुसळधार पावसाने घरे, रस्ते व पूलांचा ताबा घेतल्याने तारापूर-बोईसर, बोईसर-आतेवाडी इ. मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तर बेटेगाव पूलावरून पाणी वाहत असल्याने बोईसर-चिल्हाफाटा रस्त्यावर अवजड वाहनांची प्रचंड मोठी रांग लागून वाहतूक खोळंबली होती. एकंदरचच पावसाच्या थैमानापूढे जनजिवन सर्वत्र विस्कळीत झाले होते.
तारापूर चे प्रथमिक आरोग्य केंद्र, रोहिदास नगर, गणेशनगर, मुस्लीम मोहल्ला आंबेडकर नगर, तेलीवाडा तारापूरचा पेट्रोलपंप, पाण्याखाली गेला होता. समोरील रस्ता व कुडण, कुरगाव व परनाळी, उमरोळी, आकेवाडी, सरावली येथील रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर तारापूर आणि सिडको कॉलनी तसेच भिमनगर व भिमनगर सरावली येथील घरात शिरलेल्या पाण्यामुळै धान्य, कपडे, टीव्ही, फ्रीज तसेच घरातील मौल्यवान वस्तू भिजून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
अचानक कोसळलेल्या पावसामुळै तारापूर आणि बोईसर येथील शेकडो कुटुंबाचे नुकसान झाले आहे. सिडकोतील नागरीकांना रात्री तात्पुरता निवारा चहा नसल्याने व्यवस्था महाविर जैन यांनी तर दूपारच्या जेवणाची व्यवस्था अजय ठाकूर यांनी केल्याचे नागरिकांनी सांगितले. तर तारापूर येथील बचत गटाच्या महिलांनी सचिन व संतोष पाटील आणि जि.प. सदस्या शुभांगी कूटे व राजू कुटे इ. सह अनेकांनी वेगवेगळया भागात जेवणाची व्यवस्था केली.
दरम्यान, पालघरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी बोईसर व तारापूरला प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली व पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानी बाबतचा पंचनामा करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत यंत्रणेला देऊन पूढील कार्यवाही करण्यांत येईल असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
।आभाळ फाटून प्रचंड मुसळधार पडलेल्या पावसामुळे तारापूर बोईसरसह परिसराला पावसाने अक्षरक्ष: झोडपून टाकले. तारापूरला पूराच्या पाण्याने वेढले होते तर बोईसराला सिडको भीमनगर येथील बैठया चाळीमधून मोठया प्रमाणात पाणी शिरून धो-धो वाहत होते रात्रीच्या गाढ झोपेतच अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सर्वत्र एकच धावपळ उडाली या पुरामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले आहे.