शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला

By मनोज मुळ्ये | Updated: May 5, 2024 08:55 IST

Ratnagiri-Sindhudurg Lok sabha Election: वातावरण निर्मिती करण्यात महायुती, महाआघाडीला यश. कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

- मनोज मुळ्येलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : गेली अनेक वर्षे सुरू असलेला राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पुन्हा दिसत आहे. त्यामुळे गतवेळेपेक्षा यावेळेच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची अजूनपर्यंत एक-एकच मोठी सभा झाली आहे. मात्र, महायुतीकडून आणखी दोन मोठ्या सभा बाकी असून, त्यावर महायुतीची मोठी भिस्त आहे. सद्य:स्थितीत दोन्ही पक्षांना विजयाची समान संधी आहे.

कोकण हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, शिवसेनेत फाटाफूट झाल्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच कळणार आहे.

लोकसभेच्या मतपत्रिकेवर मशाल हे चिन्ह प्रथमच, तर कमळ हे चिन्ह ३३ वर्षांनी आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी मोठ्या सभांची संख्या मोजकीच असून, छोट्या सभा, खळा बैठका यांनाच अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्याचाही हेतू आहे.

कागदावरच्या संख्येत तरी महायुती प्रभावीगतवेळीची मते आणि त्यानंतर झालेली फाटाफूट पाहता महायुती प्रभावी दिसते. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ महायुतीकडे आहेत, तर दोनच मतदार संघ महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे महायुतीकडे ताकद अधिक आहे, असे दिसते.विनायक राऊत यांच्या मतांमधून भाजपची आणि शिंदेसेनेची मते वजा झाली आहेत. त्याबदल्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची मते त्यांना मिळणार आहेत. मात्र, वाढलेल्या मतांपेक्षा कमी झालेल्या मतांची संख्या अधिक आहे. कागदावर हे चित्र असले तरी सामान्य मतदार उद्धवसेनेच्या पाठीशी आहे की शिंदेसेनेच्या, हे स्पष्ट झालेले नाही.

सामंत बंधुंमधील वाद आघाडीच्या फायद्याचाnकिरण सामंत यांनी मंत्री उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर हटवल्याने या दोन भावांमध्ये वाद असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचा शिंदेसेनेकडून होणा�या प्रचारावर परिणाम होणार आहे. सामंतांमधील वादानंतर आता राऊत यांनी किरण सामंत यांचे कौतुक सुरू केले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देभाजपने आपला पक्ष फोडला, हाच आक्षेप लोकांसमोर ठेवत उद्धवसेनेने भाजप आणि शिंदेसेनेवर टीकास्त्र रोखले आहे.दहा वर्षांत कोकणात उद्योग उभारण्यापेक्षा येथून हाकलण्यात आलेल्या उद्योगांची संख्या अधिक आहे, असा भाजपचा आक्षेप आहे.सिडको प्राधिकरण हा उद्धवसेनेने कळीचा मुद्दा केला आहे, तर रत्नागिरीच्या विकासाचा विषय महायुतीने उचलून धरला आहे.

२०१९ मध्ये काय घडले?विनायक राऊत    शिवसेना (विजयी)    ४,५८,०२२नीलेश राणे    स्वाभिमान पक्ष    २,७९,७००नवीनचंद्र बांदिवडेकर    काँग्रेस    ६३,२१९नोटा    -    १३,७१३

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    विनायक राऊत     शिवसेना         ४,९३,०८८    ५५%२००९    नीलेश राणे    काँग्रेस    ३,५३,९१५    ४९%२००४    अनंत गीते    शिवसेना    ३,३४,६९०    ५९%१९९९    अनंत गीते    शिवसेना        २,९३,८३४    ५२%१९९८    अनंत गीते    शिवसेना        २,३८,९२८       ४६%

एकूण मतदार    १४,५१,६३०

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग