शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:50 IST

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठासमोर सुरू असलेला युक्तिवाद संपण्याची चिन्हे असताना शिंदे गटाकडून आज ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी ऑनलाइन युक्तिवादाला सुरुवात केली. यामुळे घटनापीठासमोरील आजचे वेळापत्रक विस्कळीत झाले. होळी सणामुळे पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होणार नसल्याने पुढील सुनावणी आता १४ मार्चला होणार आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. यानंतर शिंदे गटाचे महेश जेठमलानी युक्तिवाद करणार होते. परंतु अचानकपणे हरीश साळवे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. उपाहारापर्यंत त्यांनीच युक्तिवाद सुरू ठेवला. अखेर सरन्यायाधीशांनी सर्वांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, असे सांगून आता संपूर्ण युक्तिवाद शक्य नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

हरीश साळवे नेमके काय म्हणाले?हरीश साळवे म्हणाले की, आता सर्वोच्च न्यायालयाने केवळ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काहीही घडू शकले असते. राजकारणात काहीही घडू शकते. यासाठी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. 

तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली व्यक्ती पुढील मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याचे उदाहरण आहे. ठाकरे यांनी या शक्यतेची संधी गमावली. मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्याने शिंदे यांना पाचारण  करण्याशिवाय राज्यपालांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. 

आता काळ बराच पुढे गेला आहे. अपात्रतेची नोटीस दिलेल्या आमदारांनी अनेक ठरावांवर मतदान केलेले आहे. यामुळे मागे जाण्यात काहीही अर्थ नाही. केवळ चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा. यावर निर्णय घेण्यासाठी कालबद्धतेचे निर्बंध घालावे, अशी सूचनाही साळवे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय