शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं मनसेचं भविष्य; भोंग्याचा झाला फायदा, महापालिकेत मिळेल यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:10 IST

राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपाला धक्का लागला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी सायन येथे सभा का घेतली? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

मुंबई – राज्यात गुढी पाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहेत. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं सत्ताधारी शिवसेनेची अडचण वाढली आहे. त्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केला असून येत्या ५ जूनला ते अयोध्येत जाणार आहेत. परंतु त्याठिकाणी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांना कडाडून विरोध केला आहे. माफी मागत नाही तोवर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज ठाकरेंनी(Raj Thackeray) हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर त्यांना भाजपाची बी टीम म्हणून हिणवण्यात आले. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मनसेच्या राजकीय भविष्याबाबत अंदाज वर्तवले आहेत. भोंग्याचा राजकीय फायदा राज ठाकरेंना होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भोंगे वादात जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो राज ठाकरेंचा झाला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचा शिवसेनेसह भाजपालाही धक्का लागल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपाला धक्का लागला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी सायन येथे सभा का घेतली? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंनी पुढील राजकीय पावलं योग्य टाकली तर सगळ्या महापालिकांमध्ये मनसेचे ४-५ नगरसेवक दिसतील असंही त्यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदीवरील भोंगे खाली उतरलेच तसेच मंदिरावरील भोंगेही उतरवण्यात आले.

राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा अन् अयोध्या दौरा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा विषय काढत राज्य सरकारला इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करत भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत असं राज म्हणाले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या २८ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि तडीपारी कारवाई करण्यात आली. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना घ्यावी लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी आवाज कमी झाल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये भागीदारी असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाबाबत आणि मशिदीवरील अनधिकृत भोंग्याबाबत ठोस भूमिका घेणं कठीण झालं आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंना भोंगा मुद्द्याचा किती फायदा होतो हे निवडणुकीतून स्पष्ट होईल.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे