शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 20:54 IST

"जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू..."

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत येण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर अशा चर्चा यापूर्वीही अनेक वेळा झाल्या आहेत. दरम्यान, जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भात बोलताना कोळी म्हणाले, "खरे तर, एक शिवसैनिक म्हणून, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्याने आम्ही अत्यंत आनंदी आहोत. जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू. खरे तर, दिल्लीश्वराच्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळला आहे. हे सुडाचे राजकारण याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही त्याची वाट बघत आहोत." कोळी एबीपी माझासोबत बोलत होते.

कोळी पुढे म्हणाले, "चांगली गोष्ट होत असतानाच, काही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी, दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी भान ठेवायला हवे. काल परवाच मनसेचे संदीप देशपांडे उद्धव साहेबांसंदर्भात काही बोलले. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, संदीपजी उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका. आपली तेवढी क्षमता नाही." एवढेच नाही तर, "उद्धव साहेब आणि राज साहेब निर्णय घ्यायला मजबूत आहेत. त्यांचा निर्णय शिवसेना आणि मनसैनिकांसाठी अंतिम आहे. युती झाल्यानंतर आपण एकत्रितपणे काम करून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता स्थाप करून गद्दारांना आणि दिल्लीश्वराला याच  महाराष्ट्रात गाडूया," असेही कोळी म्हणाले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना