शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

राहुल गांधी पक्ष सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार? आठवलेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 17:08 IST

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यानी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

नवी दिल्ली : लोकसभेआधी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, लोकसभेला सपाटून मार खाल्ल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावरून केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी बोचरी टीका केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यानी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तसेच 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणी नुकतीच केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात एवढ्या जागा आरपीआयला सुटण्याची चिन्हे नाहीत. तर एवढ्या जागा मिळून महायुतीतील घटकपक्षांनाही मिळणार नसल्याची स्थिती आहे. महायुतीची घोषणा अद्याप व्हायची असून आचारसंहिता लागू झाली आहे. 

आज आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना मोदींवरही स्तुतीसुमने उधळली. पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार? याची परिणीती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली, असे आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी