शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन - खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 22:33 IST

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याचे संपूर्ण श्रेय एकनाथ खडसेंना जात असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. तर यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा खडसे यांनी दिला.जळगावमध्ये खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाथाभाऊ ...

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याचे संपूर्ण श्रेय एकनाथ खडसेंना जात असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. तर यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा खडसे यांनी दिला.

जळगावमध्ये खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खस्ता खाल्ल्या. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला. त्याचे पूर्ण श्रेय नाथाभाऊंनाच जाते. हा अन्याय दूर करण्यासाठी आपण पक्ष श्रेष्ठींशी बोलणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. 

यावर खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचे सांगितले. तसेच दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवादाचा आधार घेत आपल्या मागे जनता असल्याचे सुचित केले. याचवेळी खडसे यांनी एक संकल्प सोडला. आपण क्लीन चीट आहोत, हे मान्य करायला सरकार तयार नाही. यामुळे आपण दोषी नसल्याचे पटवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तसेच जर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास आपण राजकारण सोडणार असल्याचा इशारा खडसे यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMuktainagarमुक्ताईनगरBJPभाजपा