शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

नाणार रिफायनरी विदर्भात आल्यास विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:23 IST

रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

नागपूर : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने विदर्भातील विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतले. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ विकासाला गती मिळेल, अशी भूमिका काहींनी मांडली.नागरिकांचे सहकार्य आवश्यकनाणार प्रकल्प विदर्भात आल्यास विकासाला निश्चितच गती मिळेल. विदर्भात रोजगाराच्या संधी वाढतील. नाणार सोबत सरकारने टेक्सटाईल पार्क संदर्भातही तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.- भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशिमनिश्चितच विकास होईलपेट्रोलियम रिफायनरी विदर्भात जिथे कुठे जागा उपलब्ध आहे. ती उभारण्यास विरोध नाही. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास निश्चितच विकासाला गती मिळेल.- अ‍ॅड.शिवाजीराव मोघे,माजी मंत्रीरोजगाराच्या संधी वाढतीलविदर्भात उद्योग याव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेच. नाणार रिफायनरी येथे आल्यास स्वागतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील. यासोबतच ट्रान्सपोर्ट रेट कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.- विकास कुंभारे,आमदार मध्य नागपूरस्थानिक लोकांना रोजगार मिळावाविदर्भात प्रकल्प आलेच पाहिजे. कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे आहे. यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. विदर्भात रिफायनरी स्थापन झाल्यास आनंदच होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूर रेल्वेरिफायनरी गोंदियात आणापेट्रोल रिफायनरी गोंदिया जिल्ह्यात स्थापना झाल्यास विदर्भाचा विकास होईल. येथील बेरोजगारांना रोजगार मिळतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.- विजय रहांगडाले,आमदार, तिरोडाविदर्भासाठी संधीविदर्भात मोठ्या उद्योगांची संख्या कमी आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. नाणारची प्रस्तावित रिफायनरी विदर्भात स्थापन झाल्यास वैदर्भीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.- धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्रीपेट्रोलचे भाव कमी होतीलनाणारचा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. पेट्रोलचे दर विदर्भात कमी होतील. या एका प्रकल्पापाठोपाठ इतर उद्योगही विदर्भात येतील.- प्रा.राजू तोडसाम,आमदार आर्णी-केळापूरतरुणांना रोजगाराच्या संधीविदर्भात पेट्रोलचे दर जास्त आहे. इतकेच काय बेरोजगारांची संख्याही इथे अधिक आहे. अशात सरकार जर नाणारची प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात स्थापन करीत असेल अधिक चांगले होईल.- रवि राणा, आमदार, बडनेराविदर्भाचा फायदाच होईलनाणारची पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात आल्यास निश्चितच काही प्रमाणात अनुशेष कमी होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळतील.- संजय पुराम आमदार, आमगाव-देवरीमहसूल वाढेलविदर्भात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन केल्यास स्वागतच आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धल होतील. यासोबतच सरकारच्या महसुली उपत्नात वाढही होईल. यासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र