शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नाणार रिफायनरी विदर्भात आल्यास विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:23 IST

रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

नागपूर : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने विदर्भातील विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतले. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ विकासाला गती मिळेल, अशी भूमिका काहींनी मांडली.नागरिकांचे सहकार्य आवश्यकनाणार प्रकल्प विदर्भात आल्यास विकासाला निश्चितच गती मिळेल. विदर्भात रोजगाराच्या संधी वाढतील. नाणार सोबत सरकारने टेक्सटाईल पार्क संदर्भातही तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.- भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशिमनिश्चितच विकास होईलपेट्रोलियम रिफायनरी विदर्भात जिथे कुठे जागा उपलब्ध आहे. ती उभारण्यास विरोध नाही. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास निश्चितच विकासाला गती मिळेल.- अ‍ॅड.शिवाजीराव मोघे,माजी मंत्रीरोजगाराच्या संधी वाढतीलविदर्भात उद्योग याव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेच. नाणार रिफायनरी येथे आल्यास स्वागतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील. यासोबतच ट्रान्सपोर्ट रेट कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.- विकास कुंभारे,आमदार मध्य नागपूरस्थानिक लोकांना रोजगार मिळावाविदर्भात प्रकल्प आलेच पाहिजे. कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे आहे. यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. विदर्भात रिफायनरी स्थापन झाल्यास आनंदच होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूर रेल्वेरिफायनरी गोंदियात आणापेट्रोल रिफायनरी गोंदिया जिल्ह्यात स्थापना झाल्यास विदर्भाचा विकास होईल. येथील बेरोजगारांना रोजगार मिळतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.- विजय रहांगडाले,आमदार, तिरोडाविदर्भासाठी संधीविदर्भात मोठ्या उद्योगांची संख्या कमी आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. नाणारची प्रस्तावित रिफायनरी विदर्भात स्थापन झाल्यास वैदर्भीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.- धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्रीपेट्रोलचे भाव कमी होतीलनाणारचा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. पेट्रोलचे दर विदर्भात कमी होतील. या एका प्रकल्पापाठोपाठ इतर उद्योगही विदर्भात येतील.- प्रा.राजू तोडसाम,आमदार आर्णी-केळापूरतरुणांना रोजगाराच्या संधीविदर्भात पेट्रोलचे दर जास्त आहे. इतकेच काय बेरोजगारांची संख्याही इथे अधिक आहे. अशात सरकार जर नाणारची प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात स्थापन करीत असेल अधिक चांगले होईल.- रवि राणा, आमदार, बडनेराविदर्भाचा फायदाच होईलनाणारची पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात आल्यास निश्चितच काही प्रमाणात अनुशेष कमी होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळतील.- संजय पुराम आमदार, आमगाव-देवरीमहसूल वाढेलविदर्भात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन केल्यास स्वागतच आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धल होतील. यासोबतच सरकारच्या महसुली उपत्नात वाढही होईल. यासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र