शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नाणार रिफायनरी विदर्भात आल्यास विकासाला गती मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:23 IST

रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

नागपूर : रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने विदर्भातील विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे मत जाणून घेतले. यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ विकासाला गती मिळेल, अशी भूमिका काहींनी मांडली.नागरिकांचे सहकार्य आवश्यकनाणार प्रकल्प विदर्भात आल्यास विकासाला निश्चितच गती मिळेल. विदर्भात रोजगाराच्या संधी वाढतील. नाणार सोबत सरकारने टेक्सटाईल पार्क संदर्भातही तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.- भावना गवळी, खासदार, यवतमाळ-वाशिमनिश्चितच विकास होईलपेट्रोलियम रिफायनरी विदर्भात जिथे कुठे जागा उपलब्ध आहे. ती उभारण्यास विरोध नाही. हा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास निश्चितच विकासाला गती मिळेल.- अ‍ॅड.शिवाजीराव मोघे,माजी मंत्रीरोजगाराच्या संधी वाढतीलविदर्भात उद्योग याव्यात यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेच. नाणार रिफायनरी येथे आल्यास स्वागतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढतील. यासोबतच ट्रान्सपोर्ट रेट कमी झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात येतील.- विकास कुंभारे,आमदार मध्य नागपूरस्थानिक लोकांना रोजगार मिळावाविदर्भात प्रकल्प आलेच पाहिजे. कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगावर लक्ष देणे गरजेचे आहे. यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. विदर्भात रिफायनरी स्थापन झाल्यास आनंदच होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूर रेल्वेरिफायनरी गोंदियात आणापेट्रोल रिफायनरी गोंदिया जिल्ह्यात स्थापना झाल्यास विदर्भाचा विकास होईल. येथील बेरोजगारांना रोजगार मिळतील. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.- विजय रहांगडाले,आमदार, तिरोडाविदर्भासाठी संधीविदर्भात मोठ्या उद्योगांची संख्या कमी आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. नाणारची प्रस्तावित रिफायनरी विदर्भात स्थापन झाल्यास वैदर्भीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.- धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्रीपेट्रोलचे भाव कमी होतीलनाणारचा प्रकल्प विदर्भात स्थापन झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. पेट्रोलचे दर विदर्भात कमी होतील. या एका प्रकल्पापाठोपाठ इतर उद्योगही विदर्भात येतील.- प्रा.राजू तोडसाम,आमदार आर्णी-केळापूरतरुणांना रोजगाराच्या संधीविदर्भात पेट्रोलचे दर जास्त आहे. इतकेच काय बेरोजगारांची संख्याही इथे अधिक आहे. अशात सरकार जर नाणारची प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात स्थापन करीत असेल अधिक चांगले होईल.- रवि राणा, आमदार, बडनेराविदर्भाचा फायदाच होईलनाणारची पेट्रोलियम रिफायनरी विदर्भात आल्यास निश्चितच काही प्रमाणात अनुशेष कमी होईल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळतील.- संजय पुराम आमदार, आमगाव-देवरीमहसूल वाढेलविदर्भात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन केल्यास स्वागतच आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्धल होतील. यासोबतच सरकारच्या महसुली उपत्नात वाढही होईल. यासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र