शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

माेदी, शाह यांचा एक फाेन...तर आज परिस्थिती वेगळी असती : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:07 IST

युती टिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न न केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई : अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ घेत शिवेसेनेचा मुख्यमंत्री केला. 'पंतप्रधान नरेंद्र माेदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक जरी फाेन केला असता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती' असे वक्तव्य आता खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात केले. 

युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेने सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यारुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिले हाेते. परंतु ते माेडल्याने भाजपशी युती ताेडल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले हाेते. एका मराठी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बाेलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप शिवसेनेच्या युतीबाबत वक्तव्य केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र माेदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक जरी फाेन केला असता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती' असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. तसेच 'मोदी आणि शाह यांनी राज्य हातातून जाऊ दिलं पण एक फोन करुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली नाही. मला त्यांच्या या भूमिकेचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र त्यांनी हे केलं ते चांगलंच झालं आमचा फायदाच झाला' असंही राऊत यावेळी म्हणाले. 

विधानसभेच्या निकाला युतीच्या बाजूने लागला. युतीला यात 161 जागा मिळाल्या. परंतु फिफ्टी फिफ्टीच्या फाॅर्म्युल्याची बाेलणी फिस्कटल्याने भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने ठाम भूमिका घेत खाेटं बाेलणाऱ्या भाजपसाेबत जायचे नाही असे जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी