शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सगळ्या आमदार, खासदारांनी राजीनामा दिला तर..; दिलीप मोहिते पाटील यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:53 IST

सवंग लोकप्रियतेसाठी काही भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे असं आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

पुणे – मराठा क्रांती मोर्चात मी सहभागी झालो आहेत. माझ्यावर गुन्हेदेखील दाखल आहेत. मी मराठा समाजासोबत आहे. मनोज जरांगे पाटील हे खेडमध्ये आल्यानंतर त्यांच्या व्यासपीठावर मी होतो. कुठलाही राजकीय पक्ष मराठा समाजाच्याविरोधात नाही. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रखडलं आहे. सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करायचे असेल तर संसदेला कायदा करावा लागेल. महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतले तसेच मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने अधिवेशन घ्यावे. केंद्रात खासदार आणि विधानसभेत आमदार मराठा समाजाची बाजू मांडत आहेत. उद्या आम्ही जर राजीनामा दिला तर लोकांचे प्रश्न मांडणार कोण? लोकांचे प्रश्न सोडवत असू तर त्यांना आडकाठी आणू नये अशा प्रकारची भावना खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, जो तुमच्यासोबत नाही त्याला गावबंदी करा, जो तुमचे प्रश्न मांडतोय त्याला गावबंदी करू नका. केंद्र आणि राज्य शासनात अनेक मराठा समाजातील लोकांनी नेतृत्व केले आहे. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जाणवू लागली. जालनात शांततेत आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज झाला त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. आज आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यात जातपात बघत नाही. परंतु गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालखंडात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी प्रशासक आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आमदार, खासदार ही पदेच शिल्लक आहेत. आज लोकांचे प्रश्न खूप आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही बाहेर पडलो नाही तर लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नका असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मला सगळ्याच समाजाचे प्रश्न सरकारी दरबारी मांडायचे आहेत. सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडलं पाहिजे हे आम्ही केले पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी काही भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सर्व मराठा समाजाच्या आमदारांनी एकत्रित आवाज उठवून सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू. नाही दिले तर सर्वांनी राजीनामा देऊ. १-२ आमदारांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. सर्वपक्षीय सर्व आमदारांनी भूमिका घेतली तर सरकारला कायदा करणे भाग पडणार आहे. सगळे एकत्र येऊ आणि समाजासाठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊ असंही आमदार दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलं.

दरम्यान, आज राज्य सरकारच्या हातात कुठले आयुध राहिले नाही. विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानं आता केंद्र सरकारनेच यावर निर्णय घेतला पाहिजे. मराठा समाजाच्या लढ्याला १०० टक्के यश येईल. मराठा समाजाला आरक्षण मिळेलच हे खात्रीने सांगतो. संसदीय लोकशाहीत प्रत्येकाच्या पदाची गरिमा राखली पाहिजे. एकदा राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याकडे आले. काही अडचणी आहेत. मराठा समाजात अशाप्रकारे नेतृत्व जन्माला येत नाही. समाजाचे नेतृत्व करताना अविचारी आणि टोकाचा निर्णय घेऊ नये. कृपया अन्नत्याग करू नका. तुमची आम्हाला गरज आहे. तुमच्या नेतृत्वात सगळा मराठा समाजाला न्याय मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चेला तयार असतील तर टोकाचे निर्णय घेऊ नका असं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांना केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण