शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

'सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफीसाठी आयोग नेमणार, अग्निवीर योजनेची समीक्षा करणार', काँग्रेसचं मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 6:22 PM

Congress Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असे जयराम रमेश यांनी सांगितले

धुळे -  भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली व्यक्ती राहुल गांधी आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारावेळी त्यांनी पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्यानंतर तेलंगणातही अशाच गॅरंटी जाहीर केली होत्या आता या गॅरंटींची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यावेळी या गॅरंटी शब्दावर भाजपाने टीका केली होती परंतु आज दररोज मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी यावरच त्यांना भर द्यावा लागत आहे, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे, या योजनेचीही समिक्षा केली जाईल, असेही जयराम रमेश यांनी सांगितले. 

धुळे येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, महिला न्याय गॅरंटी ची घोषणा ही ऐतिहासिक व क्रांतीकारी आहे. मोदींनी १० वर्षात दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही. देशातील काही मुठभर लोकांना मोदी सरकारने १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले नाही. युपीए सरकारने मात्र शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कर्जमाफी संदर्भात एक आयोग स्थापन करून शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती संकलीत केली जाईल व कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल. अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेला धोकादायक आहे काँग्रेस सत्तेवर आल्यास या योजनेचीही समिक्षा केली जाईल.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सावित्रिबाई फुलेंच्या जन्मभूमी व कर्मभूमीत महिला सक्षमिकरणाची महिला न्याय गॅरंटी दिली ही खऱ्या अर्थाने सावित्रिबाईंचा गौरव आहे, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला ताकद देणारा आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज संस्थात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांचा भागिदारी वाढलेली दिसत आहे. महिला सक्षमिकरणात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. भाजपा सारखा चुनावी जुमला अथवा मोदी गॅरंटी सारखी खोटी नाही, काँग्रेसची गॅरंटी ही पक्की व वॉरंटी सुद्धा आहे. महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल प्रदेश  कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.  

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राDhuleधुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४