शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:01 IST

मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. पुन्हा तेच सांगतोय असं अनिल देशमुख म्हणाले.

नागपूर - जयंत पाटील यांच्यावर भाजपाकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तर राऊतांचा हा दावा भाजपाने फेटाळला. पण २ वर्षापूर्वी मलाही भाजपाने प्रस्ताव पाठवला होता असं विधान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. 

अनिल देशमुख म्हणाले की, २ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते. मी शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती पण सरकार पडले असते. याचा अर्थ तुम्ही समजून जा असं त्यांनी म्हटलं आहे. 

मविआत जागावाटपाची चर्चा होईलमहाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चेला बसतील, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचा हे ठरवतील. त्यानंतर मतदारसंघात जो कुणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवसरात्र प्रयत्न करतील असा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी पक्ष सर्वसमावेशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे २ दिवसीय पदाधिकारी शिबीर नागपूरात आहे. या शिबिराला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यापासून सगळेच हजर असतील. अतिशय महत्वाचे शिबीर असून त्याला नेते मार्गदर्शन करतील. पक्षाकडून विविध शिबीर आयोजित केले जातात. ओबीसीचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील. आमचा पक्ष सर्वसमावेशक, जातीधर्माचे लोकांचा आहे. कुठल्याही एका जातीचा आणि धर्माचा नाही असंही अनिल देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा