शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:01 IST

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

नवी दिल्ली – छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आमचं प्रेम आहे. आम्ही त्यांच्याशी कायम संपर्कात असतो. परंतु निवडणूक ही वेगळी असते. निवडणुकीत कोण कोणत्या भूमिका घेऊन उभं राहतो त्याकडे पाहिले जाते. संसदेत त्यांना बोलू दिलं नाही तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी राहिलो त्यामुळे छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विचारला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनाराज्यसभा निवडणुकीत २ जागा लढवणार आहे. लोकशाहीने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला आहे. तसेच निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यावर प्रेम आहे. पण निवडणुकीत कोणत्या भूमिका घेऊन उभे राहतात याकडे पाहिले जाते. छत्रपतींना विरोध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता. मराठा आरक्षणावर त्यांना संसदेत बोलून दिले नाही तेव्हा मी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभा राहिलो होतो असंही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या कोर्टात चेंडू ढकलला

राज्यसभा निवडणुकीबाबत अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे १ जागा असताना शिवसेनेने मोठे मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती. तेव्हा शरद पवारांनी(Sharad Pawar) पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला २ जागा देण्याचं कबूल केले होते. अलीकडेच शरद पवार, उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांची बैठक झाली आहे. त्यात याबाबत चर्चा झाली असावी. कुणी किती जागा लढवायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. १० सूचक जे आणतील ते जागा लढवू शकतात. संभाजीराजेंना(Chhatrapati Sambhajiraje)  पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांशी कुठलेही चर्चा झाली नाही. सर्वोच्च नेते बोलतील असंही त्यांनी सांगितले.

तर शरद पवारांनी मात्र राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अतिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRajya Sabhaराज्यसभा