शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

केंद्राने डाटा दिल्यास दोन महिन्यांत ओबीसींचे आरक्षण देतो : छगन भुजबळ

By यदू जोशी | Updated: July 15, 2021 07:13 IST

Bhujbal On OBC Reservation : फडणवीसांना आव्हान; कुस्तीत रस नाही, तुम्ही आमचे बॉस, मोदींकडे घेऊन चला.

ठळक मुद्देफडणवीसांना भुजबळांचं आव्हानकुस्तीत रस नाही, तुम्ही आमचे बॉस, मोदींकडे घेऊन चला : भुजबळ

यदु जोशी

देवेंद्र फडणवीस! तुम्ही आमचे बॉस, तुम्ही आमचे नेते. चला, राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा (एसईसीसी)  डाटा केंद्र सरकारकडून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घाला. आम्ही सगळे तुमच्यासोबत येऊ. केंद्राने लगेच डाटा दिला, तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल, असे आव्हान ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी दिले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

ओबीसी आरक्षण जाण्यात कोण चुकले, कोण बरोबर होते, याची चर्चा करण्यात मला रस नाही. मी आणि फडणवीसांनी तू- तू मैं- मैं करत एकाच मंचावर आल्याने त्याची बातमी जरूर होईल, पण उद्देश साध्य होणार नाही. एकमेकांशी कुस्ती करण्याची ही वेळ नाही, असे भुजबळ म्हणाले. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने गंडांतर आलेले असल्याने सध्या हा विषय बराच गाजत आहे. या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ आमने-सामने आहेत. ‘राज्याची सूत्रे द्या, मी चार महिन्यांत ओबीसींना राजकीय आरक्षण देतो’, या फडणवीस यांच्या वाक्यावर भुजबळ म्हणाले, एवढे करण्याची गरज नाही. केंद्राकडून फडणवीसांनी डाटा आणून द्यावा. आमचे सरकार त्या आधारे इम्पिरिकल डाटा तयार करून दोन महिन्यांत आरक्षण देईल. तसेही हे आरक्षण मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीच, ते आम्ही मिळवणारच. 

केंद्राकडे उद्या एसईसीसीचा डाटा दिला तरी त्याने आरक्षण बहाल करता येणार नाही, असा विरोधकांचा दावा आहे. तरीही या डाटासाठी आपण एवढे आग्रही का आहात?फडणवीस शब्दच्छल करीत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी हा डाटा केंद्राकडे मागितला होता. तो कशासाठी? कारण या डाटाशिवाय आरक्षण टिकणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या, त्यांनीही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांकडे डाटा मागण्यासाठीच्या पत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण टिकण्यासाठी हा डाटा आम्हाला हवा आहे, असे म्हटले होते. मी हे बोलणार नव्हतो, पण ते खोटेनाटे आरोप करायला लागल्यावर मी तोंड उघडले. 

डाटा, डाटा करत आपण केंद्रावर आरक्षणाची जबाबदारी ढकलत आहात, असा आरोप होत आहे. केंद्राकडील डाटामध्ये ७५ लाख चुका आहेत, चुकीचा डाटा घेऊन करणार काय?फडणवीसांना काहीही बोलू देत. ते पक्ष अभिनिवेश ठेवून बोलत आहेत. हा डाटा कुठे बाहेरच आलेला नाही तर त्यात एवढ्या चुका आहेत, हे त्यांना कुठून कळले? चुका, चुका म्हणतात ना, ते मग ऐका. अशा सर्वेक्षणात आठ ते दहा टक्के चुका असल्या तरी तो कायद्यानुसार प्रमाण मानला जातो, असे जनगणनेच्या कायद्यातच आहे. शिवाय याच सर्वेक्षणाच्या आधारे लोकाभिमुख योजनांचे लाभार्थी आजही ठरविले जात आहेत. ओबीसींचे राजकीय मागासलेपण या डाटाच्या आधारे सहज सिद्ध करता येते. 

ओबीसींना आरक्षण बहाल करण्याचा भुजबळ फॉर्म्युला काय आहे?माझा स्वत:चा असा फॉर्म्युला नाही, मी कायद्याच्या चौकटीत बोलतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातच ‘ट्रिपल टेस्ट’द्वारे हे आरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. स्वतंत्र आयोग तयार करून ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करावा. एससी, एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यानंतर ५० टक्क्यांच्या मर्यादेत उर्वरित आरक्षण ओबीसींना द्यावे, अशी ही ट्रिपल टेस्ट आहे. ती पूर्ण करावीच लागेल. मला फडणवीस यांच्याशी भांडण करायचे नाही. वादविवादाच्या आखाड्यात उतरायचे नाही. झालं गेलं विसरा, केंद्राकडून डाटा आणून द्या, एवढेच माझे त्यांना म्हणणे आहे. मी आणि गोपीनाथ मुंडेंनी ओबीसींसाठी सोबत काम केले. फडणवीस त्यांचा वारसा सांगत असतील, तर त्यांनी मदत करावी.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaharashtraमहाराष्ट्रOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार