शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 18:22 IST

Bacchu Kadu on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाने युती धर्म व्यवस्थित पाळला नाही, असा ठपका प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी ठेवला आहे. 

Bacchu Kadu Mahayuti : लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला काही मतदारसंघात उमेदवार बदलण्यास सांगितले. त्या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. याबद्दल शिवसेनेच्या विद्यमान खासदारांकडून नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली. आता आमदार बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

महायुतीत उमेदवारी देण्याबद्दल पुन्हा एकदा सर्व्हेची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "सर्व्हे तर अमरावतीतला भाजपाच्या विरोधात होता. आणि भाजपाचे अर्ध्याहून अधिक पदाधिकारी नवनीत राणांच्या विरोधात होते. मग इथल्या सर्व्हेमध्ये राणांची जागा निवडून येऊ शकत नाही, असे असताना त्यांना का बदलले नाही?", असा सवाल बच्चू कडू यांनी भाजपाला केला. 

ज्याच्या घरचे काम, त्याला करू द्या; बच्चू कडूंचे भाजपाला खडेबोल

बच्चू कडू म्हणाले, "तुम्ही यवतमाळची जागा बदलली. तुम्ही हिंगोलीची जागा बदलली शिवसेनेची. म्हणजे जागा आहे शिवसेनेची आणि भाजपा सर्व्हे करते आणि सांगते की तुम्ही इथे दुसरा उमेदवार द्या. ज्याच्या घरचे काम आहे त्याला करू द्या ना. दुसऱ्याने हस्तक्षेप करू नये", अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. 

"युतीचा धर्म खरेतर भाजपाने व्यवस्थित पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते. कुठलाही पक्ष स्ट्राईकवरूनच जागावाटप करणार आहे. मग ते आघाडी असो वा युती. निवडून येणारा माणूस गांजा विकणारा असला, तरी त्याला तिकीट दिले जाणार आहे. त्यात काय?", असे भाष्य बच्चू कडूंनी केले.  

"...तर मराठा आणि ओबीसी वाद मिटेल", कडूंनी काय सूचवला पर्याय?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. त्याचबरोबर सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठीही जरांगे आग्रही आहेत.   

मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल बच्चू कडू म्हणाले, "मला असे वाटते की, केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आहे. जर १० टक्के आरक्षण ओबीसींना वाढवून दिले. म्हणजे मराठा आणि ओबीसी असा वादही मिटेल आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणही भेटेल", असा पर्याय बच्चू कडूंनी सूचवला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv Senaशिवसेना