शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 18:22 IST

Bacchu Kadu on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाने युती धर्म व्यवस्थित पाळला नाही, असा ठपका प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी ठेवला आहे. 

Bacchu Kadu Mahayuti : लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला काही मतदारसंघात उमेदवार बदलण्यास सांगितले. त्या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. याबद्दल शिवसेनेच्या विद्यमान खासदारांकडून नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली. आता आमदार बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

महायुतीत उमेदवारी देण्याबद्दल पुन्हा एकदा सर्व्हेची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "सर्व्हे तर अमरावतीतला भाजपाच्या विरोधात होता. आणि भाजपाचे अर्ध्याहून अधिक पदाधिकारी नवनीत राणांच्या विरोधात होते. मग इथल्या सर्व्हेमध्ये राणांची जागा निवडून येऊ शकत नाही, असे असताना त्यांना का बदलले नाही?", असा सवाल बच्चू कडू यांनी भाजपाला केला. 

ज्याच्या घरचे काम, त्याला करू द्या; बच्चू कडूंचे भाजपाला खडेबोल

बच्चू कडू म्हणाले, "तुम्ही यवतमाळची जागा बदलली. तुम्ही हिंगोलीची जागा बदलली शिवसेनेची. म्हणजे जागा आहे शिवसेनेची आणि भाजपा सर्व्हे करते आणि सांगते की तुम्ही इथे दुसरा उमेदवार द्या. ज्याच्या घरचे काम आहे त्याला करू द्या ना. दुसऱ्याने हस्तक्षेप करू नये", अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. 

"युतीचा धर्म खरेतर भाजपाने व्यवस्थित पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते. कुठलाही पक्ष स्ट्राईकवरूनच जागावाटप करणार आहे. मग ते आघाडी असो वा युती. निवडून येणारा माणूस गांजा विकणारा असला, तरी त्याला तिकीट दिले जाणार आहे. त्यात काय?", असे भाष्य बच्चू कडूंनी केले.  

"...तर मराठा आणि ओबीसी वाद मिटेल", कडूंनी काय सूचवला पर्याय?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. त्याचबरोबर सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठीही जरांगे आग्रही आहेत.   

मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल बच्चू कडू म्हणाले, "मला असे वाटते की, केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आहे. जर १० टक्के आरक्षण ओबीसींना वाढवून दिले. म्हणजे मराठा आणि ओबीसी असा वादही मिटेल आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणही भेटेल", असा पर्याय बच्चू कडूंनी सूचवला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv Senaशिवसेना