शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:22 IST

2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. 

ठळक मुद्दे2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल देश हुकूमशाहीत लोटला जाईलघोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत

मुंबई: 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीत लोटला जाईल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले,  विधानसभेत सभापतीविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर 14 दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसात सभागृहात चर्चा घेवून मतदान घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो संमत करून अधिवेशन गुंडाळले जाते, ही हुकमशाहीची सुरुवात नाही तर काय, असा प्रश्‍नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांना केला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला घेराव घातले आणि सांगितले की न्याय व्यवस्थेची सुद्धा सरकार कदर करत नाही. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे. दिल्लीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणा-या लोकांची अडवणूक करण्यात येत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. याचबरोबर, देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्व सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र