शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 10:22 IST

2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. 

ठळक मुद्दे2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल देश हुकूमशाहीत लोटला जाईलघोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत

मुंबई: 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीत लोटला जाईल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले,  विधानसभेत सभापतीविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर 14 दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसात सभागृहात चर्चा घेवून मतदान घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो संमत करून अधिवेशन गुंडाळले जाते, ही हुकमशाहीची सुरुवात नाही तर काय, असा प्रश्‍नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांना केला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला घेराव घातले आणि सांगितले की न्याय व्यवस्थेची सुद्धा सरकार कदर करत नाही. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे. दिल्लीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणा-या लोकांची अडवणूक करण्यात येत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. याचबरोबर, देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्व सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र