शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

'जर पुराव्यानिशी कोणी प्रकल्पात अनियमितता दाखविली तर दुर्लक्ष करता येणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 20:28 IST

सर्व सोंग आणले जातील. पैशाचे सोंग करता येत नाही. तिजोरीची चावी आमच्याकडे आली आहे. परंतु त्या तिजोरीत काय आहे की नाही पाहावे लागणार आहे.

नागपूर -  विकास प्रकल्पांना कुठेही स्थगिती नाही. जर एखादी अनियमितता दाखवून दिली तर त्याकडे दुर्लक्ष करायचे का? पण जेव्हा काही लोक पुराव्यानिशी येतात. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही अशा शब्दात मंत्री सुभाष देसाई यांनी विरोधी पक्ष भाजपाला इशारा दिला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. 

यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, आमच्या सरकारचं काम सुरू झालेलं आहे. आम्ही प्रसिद्धी करण्याचे शिकलो नाही. परंतु काम मात्र सुरू आहेत.  स्थगिती सरकार असे टोमणे असे ऐकण्याची आम्हाला सवय झाली आहे. एकाही मेट्रो मार्गाला स्थगिती दिली नाही. २७०० झाडांची कत्तल करण्यात आली. त्या दृष्टकृत्याला विरोध करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. बेफेकिरपणा दिसला त्याला पायबंद घालण्यासाठी फक्त कारशेडला स्थगिती दिली आहे. कारशेडला पर्यायी जागा देणार. यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आहे. ती समिती पाहणी करील असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आम्ही नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला स्थगिती दिली नाही. उलट साडेतीन हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. नाव्हा शेवा ते शिवडी या ट्रान्सहार्बरला स्थगिती दिली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

तसेच  रोजगार निर्मितीवर आमचा विशेष भर राहील. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये स्थान असावे, खरं तर महाराष्ट्र असा नियम करणारे पहिले राज्य. आंध्र प्रदेशाने काही दिवसांपूर्वी घोषणा केली. १९६८ साली पहिला शासनादेश काढला. बाळासाहेबांनी मराठी बेरोजगारांसाठी आंदोलने केली. त्यानंतर ८० टक्के मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळू लागले. त्यानंतर लागोपाठ चार शासनादेश आहेत. आता कायद्याची गरज आहे, उद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना शासन अनेक सवलती देतो. परंतु त्यांनी ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना द्यायला पाहिजे. दरवर्षी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा अहवाल दिला पाहीजे. परंतु अलिकडच्या काळात कामगार विश्वास झालेल्या बदलामुळे कंत्राटी कामगार जास्त प्रमाणात भरतात. या पद्धतीवर काम करणाऱ्यांमध्ये परप्रांतियांची भरती जास्त असते. म्हणून यासंदर्भात कायदा करण्याची गरज आहे. परतावा घेण्यापूर्वी थेट नोकऱ्या आणि अप्रत्यक्ष रोजगार याची माहिती दिली पाहिजे. राज्याच्या दृष्टीने हे क्रांतीकारक पाऊल ठरेल. ठाकरे सरकार यासाठी पाऊलं टाकेल असा विश्वास सुभाष देसाईंनी व्यक्त केला.  

दरम्यान, सर्व सोंग आणले जातील. पैशाचे सोंग करता येत नाही. तिजोरीची चावी आमच्याकडे आली आहे. परंतु त्या तिजोरीत काय आहे की नाही पाहावे लागणार आहे. विकासासाठी कर्ज काढावे लागणार. सकल उत्पादनासाठी कर्ज काढावे लागणार आहे. एकूणच राज्याची ही आर्थिक स्थिती आहे. ती आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. परंतु ही जी परिस्थिती ओढावली आहे. उद्योगाबाबत जी परिस्थिती आहे. त्याबाबत कोणी बोलायला तयार नाहीत असा टोला सुभाष देसाईंनी विरोधकांना लगावला. तसेच मी पुन्हा येईल असे म्हणण्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ असे म्हणालया पाहीजे होते. परंतु आता वेळ गेली आहे. आता ते दिवस गेले. मित्रांसोबत कसे वागावे हे कळते नाही. शिवसेनेने शरण जायचे नाकारले. म्हणून शिवसेना वाढली असा चिमटाही देसाईंनी भाजपाला काढला. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस