शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर..."; प्रताप सरनाईक काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:29 IST

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे.  

'आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी द्यायची', असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेतही अशा पद्धतीने निर्णय होईल, असे म्हटले आहे. चांगली काम केले नाही, तर गच्छंती अटळ आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

मंत्रि‍पदाची शपथ घेण्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले. ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी माझा विचार केला, त्याबद्दल पक्षाचे प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्ष संघटना वाढवायची आहे. पक्ष कसा मोठा होईल, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसा न्या मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे."

अजित पवारांच्या अडीच वर्ष मंत्रिपदाच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांनी भाष्य केले.  

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

सरनाईक म्हणाले, "चांगलं काम करणार नसेल, तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते करतील. आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेबही करतील. जर चांगली कामगिरी कुठल्या मंत्र्यांने केली नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, मोठं केलं नाही. कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली नाही, तर निश्चितपणे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आमच्या पक्षातही तेच होणार आहे. जर कोणत्या मंत्र्यांने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याची गच्छंती अटळ आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

अजित पवार काय म्हणालेले?

नागपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण ज्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाची कारकिर्द मिळाली आहे. या पाच वर्षाच्या कारकि‍र्दीमध्ये साधारणपणे आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुतीpratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना