शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:05 IST

If 16 MLAs are disqualified, there will be a political Earthquake in Maharashtra - Prithviraj Chavan ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे असंही चव्हाण यांनी सांगितले.

पुणे - आजचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जर आज १६ आमदारांना अपात्र केले आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर हा एकप्रकारे राजकीय भूकंप ठरेल असं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. 

आमदार अपात्रतेबाबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की,आजच्या निकालात दोन बाजू आहेत. एक घटनात्मक तर दुसरी राजकीय. आजचा निकाल राज्यातील सर्व पक्षांकरता महत्त्वाचा आहे. जर घटनात्मकदृष्टीने याकडे पाहिले तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या १० व्या सूचीनुसार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केले पाहिजे. त्यांचे मंत्रिपद रद्द झाले पाहिजे. त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत. ही कायदेशीर बाब आहे. परंतु कायद्यात त्रुटी म्हणजे न्यायाधीश म्हणून जे काम पाहतात ते विधानसभा अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे असतात. निकाल देताना ते राजकीय पक्षाचे हित लक्षात न घेता निकाल देणार असतील तर ती अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे. जो राजकीय पक्षाने निवडून आणलेला व्यक्ती आहे. या कायद्यातील हा दोष आहे. त्यामुळेच या निकालाला जवळपास दीड वर्ष विलंब झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात बदल गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कदाचित भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात सामोरे जायचे हा संभ्रम आहे. त्यामुळे निकालातून तोही प्रश्न सोडवला जाईल का हा मुद्दा आहे. नेतृत्व बदल करण्याची ही वेळ आहे. जर पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत पक्षांतर बंदी झाली नाही असा निकाल आला तर दुर्दैवाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील. कोर्ट कचेरी, आंदोलने करावी लागेल. घटनेची पायमल्ली झालीय हे लोकांना सांगावे लागेल. त्यामुळे ४ वाजता काय निकाल येतो हे पाहावे लागेल असंही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले. 

दरम्यान, संसदीय परंपरेला हे शोभून नाही. विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत हे पाहिले नाही. त्यामुळे कशाप्रकारे निकाल लागेल याचा अंदाज मिळतो. भाजपाला नेतृत्व बदलाची संधी या निकालातून आहे. परंतु आजच ते करतील का हे माहिती नाही. ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यावर आमचे खूप आक्षेप आहेत. उद्या काहीही घडू शकेल असं वाटतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा