शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:05 IST

If 16 MLAs are disqualified, there will be a political Earthquake in Maharashtra - Prithviraj Chavan ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे असंही चव्हाण यांनी सांगितले.

पुणे - आजचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जर आज १६ आमदारांना अपात्र केले आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर हा एकप्रकारे राजकीय भूकंप ठरेल असं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. 

आमदार अपात्रतेबाबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की,आजच्या निकालात दोन बाजू आहेत. एक घटनात्मक तर दुसरी राजकीय. आजचा निकाल राज्यातील सर्व पक्षांकरता महत्त्वाचा आहे. जर घटनात्मकदृष्टीने याकडे पाहिले तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या १० व्या सूचीनुसार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केले पाहिजे. त्यांचे मंत्रिपद रद्द झाले पाहिजे. त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत. ही कायदेशीर बाब आहे. परंतु कायद्यात त्रुटी म्हणजे न्यायाधीश म्हणून जे काम पाहतात ते विधानसभा अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे असतात. निकाल देताना ते राजकीय पक्षाचे हित लक्षात न घेता निकाल देणार असतील तर ती अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे. जो राजकीय पक्षाने निवडून आणलेला व्यक्ती आहे. या कायद्यातील हा दोष आहे. त्यामुळेच या निकालाला जवळपास दीड वर्ष विलंब झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात बदल गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कदाचित भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात सामोरे जायचे हा संभ्रम आहे. त्यामुळे निकालातून तोही प्रश्न सोडवला जाईल का हा मुद्दा आहे. नेतृत्व बदल करण्याची ही वेळ आहे. जर पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत पक्षांतर बंदी झाली नाही असा निकाल आला तर दुर्दैवाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील. कोर्ट कचेरी, आंदोलने करावी लागेल. घटनेची पायमल्ली झालीय हे लोकांना सांगावे लागेल. त्यामुळे ४ वाजता काय निकाल येतो हे पाहावे लागेल असंही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले. 

दरम्यान, संसदीय परंपरेला हे शोभून नाही. विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत हे पाहिले नाही. त्यामुळे कशाप्रकारे निकाल लागेल याचा अंदाज मिळतो. भाजपाला नेतृत्व बदलाची संधी या निकालातून आहे. परंतु आजच ते करतील का हे माहिती नाही. ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यावर आमचे खूप आक्षेप आहेत. उद्या काहीही घडू शकेल असं वाटतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा