शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:21 IST

मविआने फुंकले प्रचाराचे रणशिंग

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मविआने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबविण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, असे जाहीर केले.  

ठाकरे म्हणाले, आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. 

महायुती सरकार घाबरणारे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर १५०० रुपयांत बहिणींचे प्रेम विकत घेऊ शकत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नसल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेत भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. 

जागा वाटपावरून भांडण नको जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा भाजपचा प्रयत्न: पटोले  दिल्लीत बसलेले भाजपचे नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभेत त्यांचे हे एटीएम बंद करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

संविधानावरील संकट अजूनही कायम: पवार

संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथले सरकार बदलण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केले.

पवार म्हणाले, महाराष्ट्राची उद्याची दिशा काय राहणार? महाराष्ट्रावर जे संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे पोहोचविण्यासाठी ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. मात्र, देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. कारण त्यांच्या विचारधारेला संविधानाची अडचण झाली आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले