शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

…म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 16:18 IST

राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं मुस्लीम पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.

अंबरनाथ  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवा अन्यथा लाऊडस्पीकर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. आवाजाचा त्रास केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे भोंगे हटलेच पाहिजेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर पक्षातील अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले. मात्र राज ठाकरेंना पाठिंबा देणारे मुस्लीम पदाधिकारीही मनसेत आहेत.

अंबरनाथ येथील मनसेचे मुस्लीम पदाधिकारी एहसामोद्दीन खान यांनी हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात जात दर्शन घेतले. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भोंगे हटवण्याच्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले आहे. एहसामोद्दीन खान म्हणाले की, अंबरनाथमध्ये कधीही जातीयवाद झाला नाही. शिवनगर परिसरात हनुमान मंदिरात मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मशिदीवरील भोंगे हटवावे असं म्हटलं होतं. त्यावेळी शाबीरभाई शेख यांनी शिवसेना सोडली नाही. शाबीरभाई हे अंबरनाथमधून ३ वेळा आमदार झाले. मंत्रिपद मिळाले. मीदेखील मनसे सोडणार नाही. राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे जे काही बोलले ते कायद्याने पाळण्याचं सांगितले त्यात चुकीचे काही नाही. सरकारने कायद्याचे पालन केले तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. राजसाहेबांना कधीच सोडणार नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असंही अंबरनाथ येथील मनसेचे एहसामोद्दीन खान यांनी सांगितले आहे.  

राज ठाकरे अयोध्येला जाणार

पुण्यात आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे