शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर मीच टोलनाका पेटवून टाकेन; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं ठाकरे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:08 IST

केंद्रीय राज्य मंत्री पदी कपिल पाटील यांची वर्णी लागल्याने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडीतील सर्वच महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे शहरालगत असलेल्या मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे व भिवंडी चिंचोटी तसेच भिवंडी कल्याण या चारही महामार्गावर सध्या टोलनाके सुरु आहेत. मात्र या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. भिवंडी वाडा महामार्गावर तर अक्षरशः खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरचा टोल नाका सध्या बंद आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टोल नाका सुरु होणार असल्याचे समजले आहे. रस्त्याची दुरुस्ती न करता हा टोलनाका सुरु केला तर सर्वात आधी मीच हा टोल नाका पेटवून टाकेन असं आव्हान केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील जाहीर कार्यक्रमाप्रसंगी राज्य सरकारला केले.  

केंद्रीय राज्य मंत्री पदी कपिल पाटील यांची वर्णी लागल्याने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सध्या भिवंडी वाडा मनोर रस्त्याची दुरावस्था झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता दिली आहे, परंतु टोल वसूल करणारी कंपनी राज्य सरकार विरोधात न्यायालयात गेल्याने राज्य सरकारवर आर्थिक भार नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावरील टोल वसुलीस पुन्हा परवानगी देण्याच्या तयारीत आहेत. भिवंडी वाडा हा राज्य महामार्ग राज्य शासनाने केंद्र सरकारकडे हस्तांतरीत केला तर या महामार्गाचे काँक्रेटीकरण करून भाविषयत पस्तीस वर्षांहून अधिक काळ या रस्त्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. आपण त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार या मंत्र्यांची भेट देखील घेणार आहोत मात्र राज्य शासनाने हा रस्ता केंद्राकडे हस्तांतर करण्याची सहानुभूती दाखविणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

तर दुसरीकडे स्थानिक नागरिक येथील आमदार व राज्य सरकारला प्रश्न न विचारता थेट खासदारालाच दोषी ठरवतात हे चुकीचे आहे असं कपिल पाटील म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष भगवान चंदे, समाजकल्याण न्यासचे संस्थापक डॉ सोन्या पाटील, जिपच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर, माजी सभापती अशोक शेरेकर, बी. बी. पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील