शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 12:39 IST

राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला. माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांनी १०० कोटी घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे अनिल देशमुख यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर जामीनावर देशमुख बाहेर आले. अशातच आता त्यांनी फडणवीसांवर आरोप करत आपण कोणताही समझोता केला नसल्याचे म्हटलं आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. त्यामुळे तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र तिघांनीही कोणतीही भेट न झाल्याचे म्हटलं. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करणारे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला. 

देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे माणूस पाठवला होता - अनिल देशमुख

"तब्बल १४ महिन्यांनी मी बाहेर आलो. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी माझ्याकडे समझौता करण्यासाठी त्यांचा माणूस पाठवला होता. त्यांनी फोन करुन सांगितले की, तुम्ही मला एक शपथपत्र करुन द्या. जर ते दिलं तर तुमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई होणार नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते की, अनिल देशमुख जन्मभर तुमच्यासोबत समझौता करणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करुन अडचणीत आणा अशा प्रकारचे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते," असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला.

काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेल - देवेंद्र फडणवीस

"कपोलकल्पित सत्य अनिल देशमुख बोलत आहे. यासंदर्भात बरेच सत्य माझ्याकडे आहे. योग्यवेळी ते सत्य मी बाहेर काढेल. त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे. पण ज्यावेळी मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांना लक्षात येईल. आज यापेक्षा जास्त काही बोलत नाही. जी काही घटना घडली तेव्हा ते सरकारमध्ये होते. तेव्हाच १०० कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले हे सगळं माझ्याकडे आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे