शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

Sanjay Raut : मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:50 IST

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच जामीन दिला आहे. यानंतर आता, त्यांनी कारागृहातील आपली आपबिती सांगितली आहे. कारागृहात आपल्याला 'अंडा सेल'मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे आपल्याला 15 दिवस ऊनही दिसले नाही. बराच वेळ जेलमधील फ्लडलाइट्सच्या संपर्कात राहिल्याने आता माझी दृष्टीही कमकुवत झाली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एढेच नाही, तर जेलमधील काळात आपले 10 किलो वजन कमी झाल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘

राऊत स्वतःला म्हणाले 'युद्ध कैदी' -स्वतःला 'युद्धबंदी' म्हणत, राऊत यांनी दावा केला, की जर आपण त्यांच्यासमोर (BJP) आत्मसमर्पण केले असते अथवा ‘मूक दर्शक' बनून बसलो असतो, तर आपल्याला अटक केली गेली नसती. मी स्वतःला युद्ध कैदी समजतो, सरकारला वाटते, की आम्ही त्यांच्यसोबत यूद्ध करत आहोत.

राऊत म्हणाले, आपण महाराष्ट्राचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असलेल्यांनाच कारागृहात टाकणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबामुळेच आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर दिली अशी प्रतिक्रिया - संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणं  आणि त्यांची बदनामी करणं हे महाराष्ट्राला अजिबात मंजूर नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाjailतुरुंगUddhav Thackerayउद्धव ठाकरे