शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:06 IST

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, चंद्रहार पाटलांना तिकीट कसे मिळाले, यामागचे राजकारण सांगितले.

जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी सांगलीच्या लोकसभेच्या राजकारणावरही भाष्य केले. 

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर पाटील बोलत होते. शरद पवारांची भूमिका कायम त्यागाची राहिली आहे. आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल या पेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे. मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीका पाटलांनी केली. आरक्षणावर सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, आमचा पाठिंबा असेल. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे, मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. 

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी परस्पर तिकीट देणे हे मीच मुद्दामहून घडवून आणले असे वाटत असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा लढवायची अशी ठाकरेंची इच्छा होती. काँग्रेसचे हातकणंगले शेट्टीना द्यायचे चालले होते. त्यामुळे ठाकरेंना जागा नव्हती, यातून त्यांनी अचानक जागा जाहीर केली, असे पाटील म्हणाले. उलट मलाच चंद्रहार पाटील म्हणाले होते, की त्यांना हे तिकीट कसे काय मिळाले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. 

पक्ष कसा चालला पाहिजे याचा माझ्या एवढा अनुभव कोणाला नाही. माझे दिवस मोजणाऱ्यांना पण माहित आहे, मी किती दिवस आहे. अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नाहीय. उरलेले दोघे सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. आम्ही राजकारणी लोक मत कशी पडतील हे पाहतो. पण जनतेने थोडीशी जबाबदारी घ्यावी, तात्पुरता विचार कोण करतेय. आणि महाराष्ट्राच्या हिताचा कोण विचार करतेय हे जनतेलाच समजून घ्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले. 

राजकीय नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणूक आयोगात आता कणा राहिला नाही. राजकारणात विश्वासघाताचे प्रमाण वाढले आहे. या गोष्टीतून महाराष्ट्राला बाहेर काढले पाहिजे. समाज्याने तात्पुरत्या मिशनवर असणाऱ्या लोकांना घरी घालवावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस