शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:06 IST

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, चंद्रहार पाटलांना तिकीट कसे मिळाले, यामागचे राजकारण सांगितले.

जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी सांगलीच्या लोकसभेच्या राजकारणावरही भाष्य केले. 

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर पाटील बोलत होते. शरद पवारांची भूमिका कायम त्यागाची राहिली आहे. आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल या पेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे. मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीका पाटलांनी केली. आरक्षणावर सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, आमचा पाठिंबा असेल. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे, मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. 

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी परस्पर तिकीट देणे हे मीच मुद्दामहून घडवून आणले असे वाटत असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा लढवायची अशी ठाकरेंची इच्छा होती. काँग्रेसचे हातकणंगले शेट्टीना द्यायचे चालले होते. त्यामुळे ठाकरेंना जागा नव्हती, यातून त्यांनी अचानक जागा जाहीर केली, असे पाटील म्हणाले. उलट मलाच चंद्रहार पाटील म्हणाले होते, की त्यांना हे तिकीट कसे काय मिळाले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. 

पक्ष कसा चालला पाहिजे याचा माझ्या एवढा अनुभव कोणाला नाही. माझे दिवस मोजणाऱ्यांना पण माहित आहे, मी किती दिवस आहे. अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नाहीय. उरलेले दोघे सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. आम्ही राजकारणी लोक मत कशी पडतील हे पाहतो. पण जनतेने थोडीशी जबाबदारी घ्यावी, तात्पुरता विचार कोण करतेय. आणि महाराष्ट्राच्या हिताचा कोण विचार करतेय हे जनतेलाच समजून घ्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले. 

राजकीय नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणूक आयोगात आता कणा राहिला नाही. राजकारणात विश्वासघाताचे प्रमाण वाढले आहे. या गोष्टीतून महाराष्ट्राला बाहेर काढले पाहिजे. समाज्याने तात्पुरत्या मिशनवर असणाऱ्या लोकांना घरी घालवावे, असे आवाहनही पाटील यांनी केले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस