शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:21 IST

Dhananjay Munde News: भ्रष्टाचाराचे आरोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला झालेली अटक; यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. या सगळ्या घडामोडींबद्दल मुंडेंनी पहिल्यांदाच मन मोकळं केलं. 

Dhananjay Munde Latest News: "इतके दिवस तुम्ही बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं. आता तुम्ही बोलावलं, तर मी आलो. जीवनातील प्रवास आठवला तर आता सुद्धा अंगावर शहारा येतो. आज जे काही माझ्यासोबत झालं आहे, ते मी राजकीय जीवनात स्वीकारेन. पण, माझ्यासह माझी जात, आई-वडील, मुले आणि जिल्ह्याची बदनामी केली गेली", असे सांगत मी दोन वेळा मरता मरता वाचलो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वंजारी समाजाचा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मौन सोडले. 

"जे व्हायला नको होतं, ते झालं; पण..."

धनंजय मुंडे म्हणाले, "मुंडे साहेबाच्या संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांच्यासोबत होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले, तेही पाहिले. जे व्हायला नको होतं, ते झालं; पण कधी कधी वाटतं की, साहेबांची एवढी दूरदृष्टी होती. मला बाजूला केलं नसतं, तर एका  मंत्रिमंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते", अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यासोबत आज जे काही झाले. मी राजकीय जीवनात आहे, ते सर्व स्वीकारेन. टीकाही स्वीकारेन. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. जर धनंजय मुंडे चुकला असेल, तर त्याला कधीच माफ करू नका. टीका धनंजय मुंडेपर्यंत असावी, धनंजय मु्ंडेच्या जातीपर्यंत नसावी." 

मुंडे म्हणाले, '...ते मी सहन केले'

"धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, आई-बाप, मुलाबाळांपर्यंत टीका, हे कधीच झाले नाही. माझी जात, इतर जाती आणि माझा जिल्हा एवढा बदनामा करावा? एक दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही. ते मी सहन केले", असे धनंजय मुंडे म्हणाले. 

"त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे. ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्मलो, त्याचा अभिमान आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं आहे? मंत्रि‍पदाला काय चाटायचं आहे का?", असेही मुंडे म्हणाले. 

"...तर आजारी पडलो नसतो"

"माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले गेले. न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्यांना लाख रुपयांचा दंड झाला. पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल. संघर्षात काय करायचं, तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो, तर मला आजारपण आलं नसतं. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे", असे उत्तर धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसministerमंत्रीSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण