शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:21 IST

Dhananjay Munde News: भ्रष्टाचाराचे आरोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला झालेली अटक; यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. या सगळ्या घडामोडींबद्दल मुंडेंनी पहिल्यांदाच मन मोकळं केलं. 

Dhananjay Munde Latest News: "इतके दिवस तुम्ही बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं. आता तुम्ही बोलावलं, तर मी आलो. जीवनातील प्रवास आठवला तर आता सुद्धा अंगावर शहारा येतो. आज जे काही माझ्यासोबत झालं आहे, ते मी राजकीय जीवनात स्वीकारेन. पण, माझ्यासह माझी जात, आई-वडील, मुले आणि जिल्ह्याची बदनामी केली गेली", असे सांगत मी दोन वेळा मरता मरता वाचलो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वंजारी समाजाचा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मौन सोडले. 

"जे व्हायला नको होतं, ते झालं; पण..."

धनंजय मुंडे म्हणाले, "मुंडे साहेबाच्या संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांच्यासोबत होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले, तेही पाहिले. जे व्हायला नको होतं, ते झालं; पण कधी कधी वाटतं की, साहेबांची एवढी दूरदृष्टी होती. मला बाजूला केलं नसतं, तर एका  मंत्रिमंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते", अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यासोबत आज जे काही झाले. मी राजकीय जीवनात आहे, ते सर्व स्वीकारेन. टीकाही स्वीकारेन. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. जर धनंजय मुंडे चुकला असेल, तर त्याला कधीच माफ करू नका. टीका धनंजय मुंडेपर्यंत असावी, धनंजय मु्ंडेच्या जातीपर्यंत नसावी." 

मुंडे म्हणाले, '...ते मी सहन केले'

"धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, आई-बाप, मुलाबाळांपर्यंत टीका, हे कधीच झाले नाही. माझी जात, इतर जाती आणि माझा जिल्हा एवढा बदनामा करावा? एक दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही. ते मी सहन केले", असे धनंजय मुंडे म्हणाले. 

"त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे. ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्मलो, त्याचा अभिमान आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं आहे? मंत्रि‍पदाला काय चाटायचं आहे का?", असेही मुंडे म्हणाले. 

"...तर आजारी पडलो नसतो"

"माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले गेले. न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्यांना लाख रुपयांचा दंड झाला. पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल. संघर्षात काय करायचं, तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो, तर मला आजारपण आलं नसतं. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे", असे उत्तर धनंजय मुंडेंनी कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर दिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसministerमंत्रीSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण