शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"ज्याने स्वतःच्या नातेवाईकांचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या..."; रोहित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:51 IST

आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे. 

सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छावा' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. चित्रपट पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येत आहे. त्यांचे बलिदान तरूण पिढीला प्रेणार देणारे आहे. सत्ता धाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मात्र, यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा सवाल करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते. यानंतर, आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे. 

काय म्हणाले रोहित पवार -सोशील मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. याच औरंगजेबाने आपला महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून खून केला, त्यांच्या अंगावरील भळभळणाऱ्या त्या जखमा आणि वेदनांनी संपूर्ण देशासह तमाम महाराष्ट्र आजही विव्हळत आहे. त्यामुळं औरंगजेब कुणासाठी पूजनीय असला तरी आमच्यासाठी मात्र तो स्वराज्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि मराठी माणसाचा कायम नंबर एकचा शत्रू राहील. इतिहासाचं पुस्तक न चाळता औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांचं मस्तक तपासण्याची गरज आहे."

"अबू आझमी नाक घासून माफी मागा…" - चित्रा वाघ - चित्रावाघ म्हणाल्या, "औरंग्या आणि त्याची एकंदरीतच वंशज भारतात पर्यटनासाठी आले नव्हते… त्यांनी  हिंदुस्थान लुटला… अनेक मंदिर उध्वस्त केली… लेकी बाळींची अब्रू लुटली आणि आमच्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे काय हाल केले हे सारं जग जाणतं आणि या औरंग्याच्या पिलावळीला तो विकासक वाटत असेल तर यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात. अबू आझमी @abuasimazmi आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची नाक घासून माफी मागा…" 

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?"औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होतं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का?" असा सवाल करत, "छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती, असे कुणी म्हणत असेल तर ते मी मानत नाही," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारChhaava Movie'छावा' चित्रपटAbu Azmiअबू आझमी