शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 19:08 IST

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

अमरावती : राज्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. राज्यात मतदानानंतर प्रचाराचा धुराळा शांत झाला आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता. पण, तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला. राजकारणात काहीही घडू शकतं. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

या निवडणुकीत आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, भाऊ नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्याविरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये, त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते, असे बच्चू कडू म्हणाले.

याचबरोबर, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद शमताना दिसत आहे. रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील, असेही विधान बच्चू कडू यांनी केले आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत आम्ही पाठिंबा दिलेला उमेदवारच निवडून येणार आहे. नवनीत राणा निवडून येणार नाहीत. टेक्निकल काय निकाल लागतो, ते माहीत नाही. सट्टा बाजारात कुणाचा काहीही भाव असला तरीही आम्ही ज्या प्रकारे आम्ही प्रचार केला त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. शेतकरी, मजूरवर्ग यांचे प्रश्न आम्ही मांडले आहेत. ही निवडणूक आम्ही जिंकलो आहे, आता ४ तारखेला चित्र स्पष्ट होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, जवळपास दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. शिवसेनेतल्या काही आमदारांसह त्यांनी सूरत गाठलं होतं. त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत बंड केलेल्या आमदारांसोबत बच्चू कडू सुद्धा होते.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४