उपाशी जनावरे सोडली उभ्या पिकांत!

By Admin | Updated: August 19, 2014 01:54 IST2014-08-19T01:54:22+5:302014-08-19T01:54:22+5:30

ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. माणूस कर्ज काढून, भीक मागून पोट भरेल, पण दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय?

The hungry peacock left! | उपाशी जनावरे सोडली उभ्या पिकांत!

उपाशी जनावरे सोडली उभ्या पिकांत!

रवींद्र भताने ल्ल चापोली (जि. लातूर)
ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. माणूस कर्ज काढून, भीक मागून पोट भरेल, पण दावणीला बांधलेल्या जनावरांचे काय? उपोशीपोटी जीव गेल्यापेक्षा उरलेसुरले पीक खाऊ घालून जगविले जात आहे. लातूर जिल्ह्यातील चापोली गावातील शेतक:यांची ही व्यथा. मराठवाडय़ात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र अशीच स्थिती आहे. 
शांतप्पा रामलिंग गादगे यांच्याकडे 25 एकर कोरडवाहू शेती असून, तीन लाखांचे कर्ज आहे. माणसांचे काय, आणखी कर्ज काढून पोट भरू. पण जनावरांचे काय, असा सवाल करून ते म्हणाले, गेल्यावर्षीचा थोडाफार चारा होता. गारपिटीत तोही साफ झाला. आता वीतभर आलेल्या पिकांवर जनावरांना जगवावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 
गंगाधर बावचे 24 एकरचे धनी. त्यांनी 16 एकरांत ऊस घेतला असून, उर्वरित आठ एकरांत सोयाबीन पेरले आहे. बँकेचे अडीच लाख आणि खाजगी दोन लाख असे साडेचार लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. थोडेफार आलेले सोयाबीन हरणांनी फस्त केले. 11 जनावरांनी काय खायचे? थोडेथोडे करून त्यांना उभा ऊस खाऊ घालत असल्याचे बावचे म्हणाले. नागनाथ आबंदे 14 एकरांचे मालक. त्यांनी ऊस, टोमॅटो आणि कोबीचे पीक घेतले आहे. आधी विहीर आणि बोअरला पाणी होते. आता दोन्हीकडे खरडण लागली आहे. त्यामुळे 25 जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आता ऊस तोडून त्यांना जगवत असल्याचे आबंदे म्हणाल़े शिवानंद गोरप्पा होनराव यांचीही हीच व्यथा. त्यांच्याकडे सात एकर शेती आणि चार म्हशी आहेत. त्यातली एक अलीकडेच व्याली आहे. चाराच नसल्याने ती दूधही देत नाही. पिकावर गाईचे वासरू सोडले. कोवळे पीक खाल्ल्याने ते मेले. आता या जनावरांना काय खाऊ घालायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
श्रीरामचंद्र होनराव यांच्याकडे 1क् एकर शेती असून, सात जनावरे आहेत. त्यांच्यावर जवळपास अडीच लाखांचे कर्ज आहे. पाच एकरांवरील ऊस वाळत आहे. चाराच नसल्याने जनावरांना तो खाऊ घालत असल्याचे होनराव म्हणाले.  
17 एकर शेती असलेले संभाजी जगदाळे शेतात आलेले थोडेफार पीक घालून सहा जनावरांना जगवत आहेत. तर दावणीच्या जनावरांना उपाशी कशासाठी मारायचे, म्हणून सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडत असल्याचे परमेश्वर मुर्गे यांनी सांगितले. 
 
च्पाऊस नसल्याने चा:याचा प्रश्न गंभीर बनला आह़े खरिपातील पिके वाळत आहेत़ चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही़, असे तालुका कृषी अधिकारी तुकाराम कासले यांनी सांगितले.
 
च्ऑगस्टचा अर्धा महिना संपला तरी मराठवाडय़ात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात संकट ओढवले असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाढ पाहात आहे.
 
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकत आहेत़ जनावरांच्या चा:याचाही प्रश्न गंभीर बनला आह़े परमेश्वर मुर्गे यांनी शेतातील सोयाबीनमध्ये जनावरे सोडून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आह़े 

 

Web Title: The hungry peacock left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.